शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

सरसकट कर्जमाफीने विधानसभेचा मार्ग सूकर करण्याचा भाजपचा इरादा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 16:58 IST

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्यास युती सरकारसाठी ही जमेची बाब ठरणार आहे. एकूणच सरसकट कर्जमाफीमुळे विधानसभा विजयाची फडणवीस सरकारची तयारी पूर्ण होणार असं म्हटल तर वावगे ठरणार नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील शानदार विजयामुळे पावरफूल बनलेल्या राज्यातील भाजप सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आणखी एक अडसर दूर करण्याचे निश्चित केल्याचे समजते. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याचा भाजपला फायदाच होणार आहे. परंतु, शेतकरी समस्या आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस सरकारसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा प्रामुख्याने गाजला. त्यामुळे शेतकरी समस्या, बेरोजगारी आणि आरक्षणाचे मुद्दे फारसे चर्चेत आले नाही. परंतु, विधानसभा निवडणुकीला स्थिती बदलली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा गौण असल्याचे सत्ताधारी भाजप सरकारला चांगलेच ठावूक आहे. याउलट विधानसभा निवडणुकीत राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गाजणार आहे. त्यातच नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभेत महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचे वास्तव मांडले. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याला उपाय म्हणून सप्टेंबरमध्ये सरकार सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी राज्यात कर्जमाफी घोषित केली होती. परंतु, या कर्जमाफीतील जाचक अटी आणि निकष यामुळे प्रत्येक गावात बोटांवर मोजण्याइतपत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

राज्यात फडणवीस यांच्यासमोर मराठा आरक्षणचा मुद्दा सर्वात अडचणीचा होता. परंतु, सरकारने न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. परंतु, शेतकरी आणि धनगर आरक्षणाचा मुद्यावर सरकार बॅकफूटला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी फडणवीस सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी केंद्राकडे विशेष मदत मागण्यात येणार आहे. तर धनगर आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्यास युतीसाठी ही जमेची बाब ठरणार आहे. एकूणच सरसकट कर्जमाफीमुळे विधानसभा विजयाची फडणवीस सरकारची तयारी पूर्ण होणार असं म्हटल तर वावगे ठरणार नाही.