शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

सरसकट कर्जमाफीने विधानसभेचा मार्ग सूकर करण्याचा भाजपचा इरादा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 16:58 IST

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्यास युती सरकारसाठी ही जमेची बाब ठरणार आहे. एकूणच सरसकट कर्जमाफीमुळे विधानसभा विजयाची फडणवीस सरकारची तयारी पूर्ण होणार असं म्हटल तर वावगे ठरणार नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील शानदार विजयामुळे पावरफूल बनलेल्या राज्यातील भाजप सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आणखी एक अडसर दूर करण्याचे निश्चित केल्याचे समजते. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याचा भाजपला फायदाच होणार आहे. परंतु, शेतकरी समस्या आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस सरकारसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा प्रामुख्याने गाजला. त्यामुळे शेतकरी समस्या, बेरोजगारी आणि आरक्षणाचे मुद्दे फारसे चर्चेत आले नाही. परंतु, विधानसभा निवडणुकीला स्थिती बदलली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा गौण असल्याचे सत्ताधारी भाजप सरकारला चांगलेच ठावूक आहे. याउलट विधानसभा निवडणुकीत राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गाजणार आहे. त्यातच नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभेत महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचे वास्तव मांडले. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याला उपाय म्हणून सप्टेंबरमध्ये सरकार सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी राज्यात कर्जमाफी घोषित केली होती. परंतु, या कर्जमाफीतील जाचक अटी आणि निकष यामुळे प्रत्येक गावात बोटांवर मोजण्याइतपत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

राज्यात फडणवीस यांच्यासमोर मराठा आरक्षणचा मुद्दा सर्वात अडचणीचा होता. परंतु, सरकारने न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. परंतु, शेतकरी आणि धनगर आरक्षणाचा मुद्यावर सरकार बॅकफूटला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी फडणवीस सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी केंद्राकडे विशेष मदत मागण्यात येणार आहे. तर धनगर आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्यास युतीसाठी ही जमेची बाब ठरणार आहे. एकूणच सरसकट कर्जमाफीमुळे विधानसभा विजयाची फडणवीस सरकारची तयारी पूर्ण होणार असं म्हटल तर वावगे ठरणार नाही.