शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

भाजपाने स्वपक्षाची ' काँग्रेस' केली आहे - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 08:33 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून भाजपाने स्वपक्षाची ‘काँग्रेस’ केली आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - 'सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणारही नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ' सामना'तून मुख्यमंत्री आणि भाजपावर टीका करण्यात आली आहे. ' मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची ‘काँग्रेस’ केली आहे त्याचे काय?' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. ' काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वतःत जिरवल्याने व आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ते स्वतःच काँग्रेसवाले झाले आहेत' असा टोलाच उद्धव यांनी भाजपाला लगावला आहे. तसेच काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सरकारसोबत असलेल्या युतीवरूनही उद्धव यांनी भाजपा सरकारला खडे बोल सुनावले आहेत. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
 
> राजकारणात कधी काय घडेल याचा भरवसा उरलेला नाही. इकडच्या बोटावरची थुंकी तिकडच्या बोटावर करण्याचे प्रकार तर जादूगार मंडळींनाही लाजवतील. सध्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्या पक्षास अचानक जी सूज आली आहे ती तात्पुरतीच आहे, पण जणू काही सत्तेचा अमरपट्टा आपल्याच कमरेस बांधल्याच्या थाटात घोषणा आणि वल्गना चालल्या आहेत. आम्ही त्यांच्या दुधात मिठाचा खडा टाकू इच्छित नाही. मुंबईच्या महापौरपदावरून ‘भाजप’ नेते रिकाम्या भांडय़ांची आदळआपट करताना दिसत आहेत. हा त्यांचा स्वभावधर्म असेलही, पण आता निवडणुका संपल्या आहेत हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. शिवसेनेस मुंबईत काही जागा कमी मिळाल्या. पण सलग पाचव्यांदा मुंबईकरांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला, याचा काय अर्थ घ्यायचा? भाजपचाही आकडा मोठा लागला, पण शेवटी सट्टेबाज व शेअर बाजारातील बंद मुठीवाल्यांनी मतांबरोबर पैशांची उधळण केल्यावर राजकारणात विजयाचे नगारे वाजणारच. तसे ते वाजले आहेत म्हणून सत्तेचा वापर करून नव्याने हातचलाखीचे प्रयोग करणे धक्कादायक आहे. ‘‘भाजपने निवडणुकीत पैशांचा महापूर केला. मी खोटे बोलत असेन तर भाजपने माझ्यावर गुन्हा दाखल करावा’’ असे आव्हान ‘भारिप’ नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. हे परखड सत्य आहेच. 
 
> दुसरे सत्य असे की मोदींची नोटाबंदी गरीबांसाठीच होती, पण नोटाबंदी असताना ज्यांनी धो धो पैशांचा पाऊस पाडला त्यांनी आता इतरांना नीतिमत्तेचे दाखले देऊ नयेत. हा महापूर मुंबई, पुणे, उल्हासनगर, ठाण्यासह सर्वत्र दिसला तरी शिवसेनेने मुंबई-ठाण्यात तो रोखलाच आहे. तरीही ज्यांनी या महापुरात गटांगळय़ा खाण्यातच स्वतःस धन्य मानले त्यांना लवकरच आई जगदंबा सुबुद्धी देवो. पैसा हाच पंचप्राण मानणारे विजयासाठी व सत्ता टिकविण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे. भारतीय जनता पक्षाच्या ‘तोंडपादऱ्यां’नी सध्या नवी फुसकुली सोडून स्वतःच्याच नाकातील केस जाळून घेतले आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना काँग्रेसच्या मदतीने महापौरपद मिळविणार असल्याची कुजबुज या तोंडपादऱयांनी सुरू केली व त्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘‘भाजप काँग्रेससोबत जाणार नाही, जायचे असेल त्यांनी जावे.’’ निवडणुका संपल्या तरी मुख्यमंत्री आजही प्रचाराच्या व्यासपीठावरच आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विधानांचे आणि भूमिकेचे स्वागतच करतो, पण त्यात थोडा बदल करू इच्छितो. मुख्यमंत्र्यांनी असे बोलायला हवे होते की, ‘‘आम्ही म्हणजेच भाजप काँग्रेससोबत जाणार नाही, पण पाकिस्तानवादी मेहबुबा मुफ्तीसोबत जाणार!’’ 
 
> काँग्रेस नक्कीच संशयास्पद आहे, पण अफझल गुरूसारख्या अतिरेक्यांचे खुले समर्थन करणाऱया मेहबुबा मुफ्तीबरोबर ‘सत्ता’ उबवणे हे जास्त घातक आहे. अर्थात हा ‘घातकी’ प्रकार राष्ट्रासाठी केल्याची टिमकी वाजवायला हे मोकळेच आहेत! अफझल गुरूस काँग्रेस राजवटीत फासावर लटकवले व मेहबुबा मुफ्ती या भाजपबरोबर सत्तेत असताना अफझल गुरूस ‘हुतात्मा’ वगैरे मानतात हे शिवरायांसमोर मस्तक टेकणाऱयांना चालते काय? अफझल गुरूस शहीद किंवा क्रांतिकारक मानणे म्हणजे अफझलखानास शिवशाहीचे प्रेरणास्थान मानण्यासारखेच आहे. मुख्यमंत्र्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतले व आपला विजय शिवचरणी अर्पण केला. म्हणजे जे ढोंग निवडणुकीआधी हुतात्मा स्मारकावर जाऊन केले तेच ढोंग रायगडावर झाले. शिवरायांचा महाराष्ट्र अखंड आणि अभंग राहणार की नाही हे आधी बोला. त्यावर एकही तोंडपादरा बोलायला तयार नाही. काँग्रेससोबत जायचे की नाही हा वाद निरर्थक असून अफझल गुरूच्या ‘गॉडमदर’ मेहबुबा मुफ्तीशी संबंध ठेवायचे की नाही हाच खरा देशासमोरील सवाल आहे. 
 
> जवानांच्या चकमकीत मारलेल्या अश्रफ वानीच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत मेहबुबा मुफ्ती देत आहेत व त्या सरकारी आदेशांवर ‘भाजप’ सरकारने अंगठा उमटवून जवानांच्या हौतात्म्याचा अवमान केला आहे. दुसरे असे की, मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची ‘काँग्रेस’ केली आहे त्याचे काय? त्यामुळे काँग्रेस परवडली, पण भाजपची सध्या झालेली काँग्रेस महाराष्ट्राला आणि देशाला कुठे घेऊन जाणार हा प्रश्नच आहे. विजय मिळाला व आकडे वाढले म्हणून प्रतिष्ठा मिळेलच असे नाही. कधीकाळी असे आकडे काँग्रेस-राष्ट्रवादीलाही मिळत होते, पण प्रतिष्ठा मिळाली काय? काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वतःत जिरवल्याने व आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ते स्वतःच काँग्रेसवाले झाले आहेत. ‘साला मैं तो साब बन गया’च्या तालावर ‘‘साला मैं तो काँग्रेसवाला बन गया’’ असे नवे गीत रचून त्यावर विजयाच्या फुगड्या घालणाऱ्यांना सलाम!