शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “...म्हणूनच शरद पवारांना अजूनही दौरे करावे लागतात, पण त्याने काही फरक पडणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 20:10 IST

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता कुठलेही काम राहिलेले नसून, त्यांना राज्यातील जनता फार महत्त्व देत नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.

Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या एका विधानावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. यावर भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पलटवार केला असून, शरद पवारांनी कितीही दौरे केले, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, असा टोला लगावला आहे. 

सुप्रिया सुळेंनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शरद पवारांचा दाखला देत सत्तेत येण्याचं विधान केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे जाहीर सभेत नुकतेच सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवरील लोकांच्या प्रेमाबद्दल आपले मत व्यक्त केले. निवडणुकीमध्ये पडझड होत असते हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेले नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. यावरून गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. 

राष्ट्रवादीला स्वबळावर तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाही

राज्यात गेल्या ४० ते ५० वर्षांपासून राष्ट्रवादीला स्वबळावर तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाही. विश्वासघात न करता, कुणाच्या पाठीत खंजीर न खूपसता त्यांना कधी मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. राष्ट्रवादीला आता दौरे करत बसावे लागते. शरद पवार यांचे कितीही दौरे झाले, तरीदेखील काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी पक्ष नको असे म्हणणाऱ्या युवकांची फळी राज्यात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारीपणाला यांच्या जातीवादीपणाला आणि यांच्या विश्वासघातीपणाला राज्यातील लोकांनी कायम नकार दिला आहे. पुढेही देतील, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता कुठलेही काम राहिलेले नाही. त्यामुळे काहीतरी वाद उफाळण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. त्याला राज्यातील जनता फार महत्त्व देत नाही, असे प्रत्युत्तर गोपीचंद पडळकर यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना दिले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण