शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री होणार? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यावर मोठी जबाबदारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 14:43 IST

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपचा नेता पालकमंत्री म्हणून काम पाहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर आता कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आता भाजपचा पालकमंत्री होणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू नेत्यावर पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडानंतर राजकीय स्थिती काहीशी बदलेली दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत भाजपसोबत युती केली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांसोबत त्यांची आधीपासूनच असलेली मैत्री आणखीनच घट्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा नेता पालकमंत्री म्हणून काम पाहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. हा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असून, बंडखोरांसोबत सूरत ते गुवाहाटीपर्यंत हा नेता गेला होता.

देवेंद्र फडणवीसांचा विश्वास आणि एकनाथ शिंदेंशी चांगला कनेक्ट

ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी डोंबिवलीतील भाजप नेते आणि नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आले आहे. रवींद्र चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते मानले जातात. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतही त्यांचा चांगला संवाद आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यात एका मर्जीतील नेत्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी, असा विचार शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस हेदेखील करत असल्याची माहिती आहे. त्यातूनच रवींद्र चव्हाण यांचे नाव समोर आल्याचे समजते.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेकडे आता ठाणे जिल्ह्यात तुल्यबळ नेता नाही. या पार्श्वभूमीवर आसपासच्या शहरातील बड्या भाजप नेत्याकडे ही जबाबदारी सोपवावी लागणार आहे. मात्र अनुभव आणि वयाने ज्येष्ठ असलेल्या नवी मुंबईतील गणेश नाईक आणि किसन कथोरे यांच्यासारख्या नेत्यांकडे हे पद दिले तर नेहमी त्यांना आदेश देणे, त्यांच्याकडून काम करुन घेणे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शक्य होईलच असे नाही. त्यामुळे आपल्या वयाच्या आणि शब्दाच्या अधीन राहू शकेल, अशा रवींद्र चव्हाण यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी, असा विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून केला जात असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस