शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री होणार? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यावर मोठी जबाबदारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 14:43 IST

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपचा नेता पालकमंत्री म्हणून काम पाहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर आता कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आता भाजपचा पालकमंत्री होणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू नेत्यावर पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडानंतर राजकीय स्थिती काहीशी बदलेली दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत भाजपसोबत युती केली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांसोबत त्यांची आधीपासूनच असलेली मैत्री आणखीनच घट्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा नेता पालकमंत्री म्हणून काम पाहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. हा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असून, बंडखोरांसोबत सूरत ते गुवाहाटीपर्यंत हा नेता गेला होता.

देवेंद्र फडणवीसांचा विश्वास आणि एकनाथ शिंदेंशी चांगला कनेक्ट

ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी डोंबिवलीतील भाजप नेते आणि नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आले आहे. रवींद्र चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते मानले जातात. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतही त्यांचा चांगला संवाद आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यात एका मर्जीतील नेत्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी, असा विचार शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस हेदेखील करत असल्याची माहिती आहे. त्यातूनच रवींद्र चव्हाण यांचे नाव समोर आल्याचे समजते.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेकडे आता ठाणे जिल्ह्यात तुल्यबळ नेता नाही. या पार्श्वभूमीवर आसपासच्या शहरातील बड्या भाजप नेत्याकडे ही जबाबदारी सोपवावी लागणार आहे. मात्र अनुभव आणि वयाने ज्येष्ठ असलेल्या नवी मुंबईतील गणेश नाईक आणि किसन कथोरे यांच्यासारख्या नेत्यांकडे हे पद दिले तर नेहमी त्यांना आदेश देणे, त्यांच्याकडून काम करुन घेणे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शक्य होईलच असे नाही. त्यामुळे आपल्या वयाच्या आणि शब्दाच्या अधीन राहू शकेल, अशा रवींद्र चव्हाण यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी, असा विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून केला जात असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस