शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Devendra Fadnavis: आज झुकला तर पुन्हा भगव्याचं दर्शन होणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 21:50 IST

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगव्या वस्त्रातील फोटो असायचा. त्या फोटोकडून उर्जा मिळायची पण आज त्याच फोटोवर सोनिया गांधी आणि त्यांचा हात दिसला त्याने वेदना झाल्या

कोल्हापूर – आमची लढाई माऊलीशी नाही, त्या माऊलीच्या मागे दडलेत त्यांच्याशी आमची लढाई आहे. माऊलींच्या नावाने ही जागा निवडून आणली तर २०२४ मध्ये काँग्रेसचा पंजा घेऊन पालकमंत्री याच मतदारसंघातून उभे राहणार आहेत. ही लढाई व्यक्तीची नाही तर विचारांची लढाई आहे. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यांच्याशी लढाई आहे. राम काल्पनिक आहे असं म्हणणाऱ्यांशी लढाई आहे. ज्यांनी कलम ३७० हटवण्याला विरोध केला त्यांच्याविरोधात लढाई आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ते कोल्हापूरात आले होते.  

या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोल्हापूरनं महाराष्ट्र केसरी खिताब पटकवला पण १२ तारखेला कोल्हापूर उत्तरची गदा भाजपाच्या नानांकडे सोपवण्याचं मतदारांनी ठरवलं आहे. छत्रपती शिवरायांचं या नगरीवर विशेष प्रेम होतं. शत्रूला शिवरायांनी जसं परतवून लावलं तसं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाला कोल्हापूरकरांना पळवून लावलं पाहिजे. पावनखिंडीत केवळ ५०० मावळे १० हजार शत्रूंच्या सामोरे गेले. त्या पराक्रमाची ही भूमी आहे. महाराणी ताराराणी यांनी शत्रूंना झुंजवून ठेवले. कोल्हापूरमध्ये एका चौकात हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगव्या वस्त्रातील फोटो असायचा. त्या फोटोकडून उर्जा मिळायची पण आज त्याच फोटोवर सोनिया गांधी आणि त्यांचा हात दिसला त्याने वेदना झाल्या. कोल्हापूरकरांनी भगव्याला भक्कम साथ दिली. परंतु आज भगव्याची एलर्जी असणाऱ्यांमागे शिवसेना लागली आहे. ज्याच्या रक्तात लाल रक्तासोबत भगवा आहे. त्यांना आव्हान आहे. कोल्हापूर उत्तर हे भगव्याचं आहे. भगव्याकडे आलेच पाहिजे. आज झुकला तर पुन्हा भगव्याचं दर्शन होणार नाही असं सांगत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

तसेच काश्मीरात तिरंगा डौलात फडकतोय. काश्मीर फाईल्सचाही विरोध केला. हिंदूची कत्तल उघडपणे केली जात होती. माता भगिनींवर अत्याचार होत होती. त्यावेळी दिल्लीत काँग्रेसचं सरकार होते. तोंडावर बोट ठेवून हे सगळं पाहत आहे. हा इतिहास काश्मीर फाईल्सनं दाखवला म्हणून त्याचा धिक्कार हे करतात. ही निवडणूक साधी नाही. इतके वर्ष तुमच्या हाती सत्ता दिली तुम्ही काय दिवे लावले? कोल्हापूरचा टोल काढण्यासाठी मला आणि चंद्रकांत पाटलांना यावं लागलं. हे आंदोलन शेवटपर्यंत पोहचवण्याचं काम भाजपाने केला असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात दहशतीचं वातावरण

महाराष्ट्रात दहशतीचं वातावरण आहे. सामान्य माणसांवर दंडुके चालवले जात आहे. परंतु तुमचा मुकाबला आम्ही करू आणि सर्वसामान्यांना सुरक्षा देऊ. महाराष्ट्रात सरकार नसून भ्रष्टाचार आहे. कोविड काळात सामान्य माणूस होरपळत होता. प्रत्येक व्यक्ती टाहो फोडत होता. पण बारमालक, दारू व्यावसायिकांसाठी सरकारनं करात सवलत दिली. हे बेवड्यांचे सरकार आहे का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले पण निधी नाही

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर आंदोलन करताय. महाराष्ट्रात ५२ रुपये सरकार पेट्रोल डिझेलवर घेत आहे. भाजपाशासित राज्याने पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला. केंद्राने शुल्क कमी केले. मात्र राज्य सरकारने एकही दमडी कमी केली नाही. शिवसेनेची गत अशी मुख्यमंत्री पद मिळाले परंतु अर्थसंकल्पात २० टक्केही निधी शिवसेनेच्या वाट्याला नाही. महाराष्ट्राला लुबाडण्याचं काम हे सरकार करत आहे.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस