शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मराठा-ओबीसी नेते आरक्षणावरुन आमनेसामने; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:40 IST

BJP DCM Devendra Fadnavis News: ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही समाजाचे नेते दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.

BJP DCM Devendra Fadnavis News: मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा नेते आमनेसामने आल्याचे चित्र आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा दोन्ही समाजातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. काही झाले तरी ओबीसीतून आरक्षण मिळावे, यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यासाठी ओबीसी समाजातील नेते आग्रही आहेत. मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.

कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न सोडवणार आहे

दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आमची सह्याद्रीवर बैठक आहे. आमचे अहित केले असे कोणत्याही समाजाला  वाटू नये. कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न सोडवणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरीकडे, आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण दिले पाहिजे. ते टीकलेही पाहिजे, आम्हाला हैदराबादचे गॅझेटही लागू केले पाहिजे. आम्हाला नेहमी यांनी फसवले आहे. कितीही फसवणूक केली तरीही मी समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून देणार, तुम्ही आम्हाला फसवले तर आम्ही तुम्हाला डुबवले म्हणून समजायचे. तुम्ही गोड बोलून आम्हाला फसवत आहात, आता आम्ही तुमचा कार्यक्रम करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु  हाके उपोषणावर ठाम आहेत. ओबीसी आरक्षणास कसा धक्का लागत नाही,  सगेसोयरेचे काय , हे सरकारने सांगावे. येथे निवडणुकांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले आहे. आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले नाही तर हे उपोषण सुरुच राहणार. आम्ही लेखी घेतल्या शिवाय उपोषण सोडणार नाही. आमचा जीव गेले तरी चालेल. आमच्या २९  टक्क्याला कुठेही धक्का लागणार नाही, हे लिहून द्यावे. मागच्या दाराने निघालेले ५७ लाख प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी केली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण