शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महाराष्ट्रात कायद्याचा बट्याबोळ; भाजपची ठाकरे सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 11:21 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कामकाज सोडून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षासमोर लोटांगण घालत सुट्टीवर गेले असल्याची टीका सुद्धा भाजपने केली आहे.

मुंबई : जालन्याची घटना ताजी असतांनाचं वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी घडली. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रात कायद्याचा बट्याबोळ करून ठेवला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या शांतताप्रिय जिल्ह्याला सोमवारी हिंगणघाट येथील क्रूर घटनेने गालबोट लागले. महाविद्यालयात निघालेल्या २४ वर्षीय प्राध्यापक तरुणीला भर रस्त्यावर लोकांच्या समोरच पेट्रोल टाकून पेटवण्यात आले. प्राध्यापिका ४० टक्के जळाल्याने तिला नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक केली आहे.

तर यावरून विरोधीपक्ष आक्रमक झाले असून, राज्यात कायद्याचा धाक उरला नसल्याची टीका होत आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना दिल्लीतल्या गोळीबाराच्या घटना चिंताजनक वाटत आहे. मात्र कोल्हापूरमध्ये तरुण मुली गायब होत असून राज्यात बलात्काराच्या, खुनाच्या घटना घडत असताना त्याबद्दल बोलयला त्यांना वेळ नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

तर ठाकरे सरकारने महराष्ट्रात कायद्याचा बट्याबोळ करून ठेवला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कामकाज सोडून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षासमोर लोटांगण घालत सुट्टीवर गेले असल्याची टीका सुद्धा भाजपने केली आहे.