शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

प्रवक्त्यांमुळे भाजपा सातत्याने अडचणीत; राम कदम, मधू चव्हाण, अवधूत वाघ यांच्यामुळे पंचाईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 01:53 IST

सिद्धी माध्यमांमधून पक्षावर होणारी टीका, आरोप आदींना सामोरे जात त्यातून पक्षाची व पक्षातील नेत्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी प्रवक्त्यांवर असते पण प्रवक्त्यांमुळे पक्षच अडचणीत आल्याचा अनुभव सध्या प्रदेश भाजपाला येत आहे.

मुंबई : प्रसिद्धी माध्यमांमधून पक्षावर होणारी टीका, आरोप आदींना सामोरे जात त्यातून पक्षाची व पक्षातील नेत्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी प्रवक्त्यांवर असते पण प्रवक्त्यांमुळे पक्षच अडचणीत आल्याचा अनुभव सध्या प्रदेश भाजपाला येत आहे.भाजपाचे एक प्रवक्ते आमदार राम कदम यांनी मुलींविषयी वादग्रस्त विधान करून मध्यंतरी टीका ओढावून घेतली होती. त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना साधी कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली नाही. तर दुसरे प्रवक्ते मधु चव्हाण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या ऐन तोंडावर झालेल्या या प्रकाराने खळबळ माजली होती. चव्हाण यांच्यावरदेखील पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. राम कदम आणि चव्हाण यांना कोणत्याही चॅनेलकडून आता प्रवक्ते म्हणून बोलविले जात नाही, अशी परिस्थिती आहे.अन्य एक प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे ११ वे अवतार असल्याचे टिष्ट्वट करून शुक्रवारी वाद ओढावून घेतला. इंदिरा गांधी व राजीव गांधी हे शहीद झाले नव्हते असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते.भंडारी, उपाध्ये लढवत आहेत किल्लामाधव भंडारी आणि केशव उपाध्ये हे दोन महत्त्वाचे प्रवक्ते शिल्लक आहेत की, ज्यांची जीभ घसरलेली नाही. भंडारी अत्यंत विश्वासाने माध्यमांमध्ये बोलतात. उपाध्ये हे बरीच वर्षे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पीए होते. एक पीए प्रवक्ते म्हणून काय दिवे लावणार, अशी अपप्रसिद्धी स्वत:ला ‘वाघ’ म्हणवून घेणाऱ्यांनी केली होती, पण इतरांपेक्षा उपाध्ये उजवे ठरत आहेत.

टॅग्स :BJPभाजपा