शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

विरोधकच नसल्याचा भाजपचा दावा, तरी मोदी-शाह यांच्या सभांसाठी जोर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 14:27 IST

विरोधी पक्ष अस्तित्वात नसून शाळकरी मुलांना विचारले तर, तेही सांगतील कोण निवडून येणार एवढा आत्मविश्वास भाजप नेत्यांना आहे. मात्र असं असेल तर मग पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रचारासाठी काय गरज, असा सवाल बार्शी येथील सभेत शरद पवारांनी उपस्थित केला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर भारतीय जनता पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकाला सामोरे जाताना फॉर्मात आहे. अर्थात ओपिनियन पोलमधून देखील भाजपसाठी पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात आले आहे. हाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार विरोधीपक्ष नसल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या सभांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नसल्याच्या भाजपच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वाऱ्याची दिशा पाहून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश मिळविण्यावर भर दिला. यापैकी अनेकांना प्रवेश मिळाला तर काही आहे तिथेच कायम राहिले. विरोधीपक्षाचे नेते आपल्या पक्षात घेतल्याने सत्ताधारी भाजपची ताकत वाढली. याच वाढलेल्या ताकतीच्या जोरावर भाजपने युतीत अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. अर्थात जागा वाढवून घेण्यामागचा मुख्य हेतू  भाजपचा स्पष्ट बहुमत हाच आहे.

मागील पाच वर्षांत अनेक नेते सोडून गेल्यामुळे विरोधीपक्ष कमकुवत बनला आहे. मात्र निवडणुकीची तयारी विरोधी पक्षाने देखील जोरात सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार खुद्द मैदानात उतरले आहे. तर काँग्रेसने पहिल्या यादीत अनेक आश्वासक उमेदवार दिले आहेत. पण सत्ताधाऱ्यांकडून समोर प्रतिस्पर्धीच नसल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी विरोधी पक्षाची धास्ती देखील घेतल्याचे दिसून येते. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या प्रचारसभांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

दरम्यान विरोधी पक्ष अस्तित्वात नसून शाळकरी मुलांना विचारले तर, तेही सांगतील कोण निवडून येणार एवढा आत्मविश्वास भाजप नेत्यांना आहे. मात्र असं असेल तर मग पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रचारासाठी काय गरज, असा सवाल बार्शी येथील सभेत  शरद पवारांनी  उपस्थित केला आहे.