शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

“२०१७ मध्येच फडणवीसांनी सगेसोयरे कायदा केला, पण मराठा मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवला नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 20:13 IST

BJP Chandrakant Patil News: शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते. परंतु, यासंदर्भात काही केले नाही. देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याचा राग त्यांच्या मनात आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

BJP Chandrakant Patil News: आतापर्यंत मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले. शरद पवार हे तर चार वेळा मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस संपूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले, हीच बाब शरद पवारांना जास्त खटकते. तोच राग आहे. परंतु, इतके मराठा मुख्यमंत्री होऊनही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. महाराष्ट्रातील ३८२ जाती मंडल आयोगाने शोधून काढल्या, कुणबीही त्यात आहेत. कुणबी हे मराठा आहेत की, नाही हे कोणीही शोधण्याचे प्रयत्न केले नाही. कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी हे केले नाही. कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा जात ओबीसी यादीत टाकायला हरकत नव्हती, पण तसे कोणीही केले नाही, असा दावा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला. 

भाजपाचे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. हैदराबाद गॅझेट लागू करणे तसेच एक दिवसाचे अधिवेशन घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर,  विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो ते पत्र मुख्यमंत्री यांनी राज्यपाल यांना पाठवायचे असते. तुमची ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचवतो. शासनाचा प्रतिनिधी म्हणून जसा आलो आहे, तसा विद्यार्थी दशेत काम करणारा मित्र म्हणून तुम्हाला भेटायला आलो आहे, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. 

२०१७ मध्येच देवेंद्र फडणवीसांनी सगेसोयरे कायदा केला

रक्तसंबंध सगेसोयरे याचा अर्थ मला आरक्षण मिळाले तर माझ्या मुलांना आपोआप मिळणार यालाच सगेसोयरे म्हणतात. आईकडून येणारे रक्तसंबंध सर्वोच्च न्यायालय मान्य करत नाही. सगेसोयरेचा कायदा २०१७ मध्येच लागू झाला आहे. हा कायदा देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच केला आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी म्हटले की, ते न्यायालयात जाईल, टिकेल की नाही, ते आता माहिती नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, दुसरी मागणी ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी आहे. १९०२ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मराठा आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. मराठा समाज गरीब आणि शेतीवर अवलंबून असल्याने त्यावेळी आरक्षण दिले. स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे आरक्षण होते, त्यानंतर घटनात्मक आणि कायदेशीर असे दोन पद्धतीने आरक्षण राहिले. घटनात्मकमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीला आरक्षण देण्यात आले. नंदुरबारमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण आहे, कारण तिथे एसटी, एसटी जास्त आहेत. त्यामुळे जिथे एसटी, एससी जास्त असतील तर पन्नास टक्के अट ओलांडल्यास चालते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण