शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

राज ठाकरेंना इशारा का दिला? छत्रपती शिवराय, शाहू महाराजांचे नाव घेत ब्रिजभूषण सिंह म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 16:05 IST

स्वस्तातील प्रसिद्धी अन् लोकप्रियतेसाठी राज ठाकरे उत्तर भारतीयांना शिवीगाळ आणि मारहाण करतात, अशी टीका ब्रिजभूषण सिंह यांनी केली.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मनसैनिक मोठ्या प्रमाणावर तयारीला लागले आहेत. मात्र, यातच उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला आहे. यानंतर मनसेही आक्रमक झाली आहे. मात्र, ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना इशारा का दिला, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. खुद्द ब्रिजभूषण सिंह यांनी याचा खुलासा केला आहे. 

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांसारखे लोक जन्मले, मात्र त्याच भूमीवर उत्तर भारतीयांना शिवीगाळ करणारा आणि मारहाण करणारा राज ठाकरे नावाचा व्यक्ती जन्मला. महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांसारखे लोक जन्मले आहेत. मराठ्यांनी देशासाठी पानिपतपर्यंत येऊन युद्ध केले. हा महाराष्ट्राचा एक अभिमानास्पद इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्रत्येक जातीचे त्यांचे विश्वासाचे लोक होते. मात्र, त्याच शिवाजी महाराजांच्या भूमीवर राज ठाकरे नावाचा व्यक्ती जन्मतो. हा व्यक्ती मराठी माणूस आणि उत्तर भारतीय असा मुद्दा निर्माण करतो, अशी ठाम भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे. 

प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी टॅक्सीवाल्यांना मारहाण

राज ठाकरे यांनी स्वस्तातील प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी टॅक्सीवाले, विद्यार्थी यांना मारहाण केली. चित्रपट क्षेत्रातील लोकांना शिवीगाळ केली. राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर यूपी, बिहार, झारखंडच्या लोकांना शिवीगाळ करतात. राज ठाकरेंनी २००७ पासून २०२०-२१ पर्यंत योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आज त्या व्यक्तीचं ह्रदयपरिवर्तन झाले आहे. ते अयोध्येला येत आहेत, असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

राज ठाकरे अजानचा विरोध करो अथवा हनुमान चालिसा म्हणोत

महाराष्ट्रात राज ठाकरे अजानचा विरोध करोत, अथवा हनुमान चालिसाचं पठण करोत, त्याच्याशी काही घेणेदेणे नाही. माझी भूमिका पक्षाची भूमिका नाही, माझी व्यक्तिगत भूमिका आहे. मी उत्तर भारतीय आहे आणि उत्तर भारतीय म्हणून राज ठाकरे यांनी आमचा अपमान केला आहे. श्रीरामही उत्तर भारतीय होते. याच भगवान राम यांच्या वंशजांना मागील २० वर्षे सातत्याने ज्या व्यक्तीने मारहाण करण्याचे, अपमानित करण्याचे काम केले त्यांनी यासाठी माफी मागावी. त्यांनी अयोध्येत येण्याला आमचा आक्षेप नाही, अशी ठाम भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश