शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

“राहुल गांधींनी सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये”; भाजपचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:57 IST

५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा होऊनही स्वातंत्र्यवीर डगमगले नाहीत, त्यांचा त्याग आणि तेज ED नोटीसने रडकुंडीला आलेल्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

मुंबई: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) ईडीसमोर हजर झाले. राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून परदेशात होते. यामुळे त्यांनी ईडीकडे चौकशीची वेळ पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु झाल्या. दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले. दरम्यान, काँग्रेस पक्षाने केलेल्या निदर्शनाचा भाजपकडून समाचार घेतला जात असून, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यातच आता राहुल गांधी यांनी सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये, असा खोचक टोला भाजपने लगावला आहे. 

राहुल गांधी यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध म्हणून काँग्रेसने राहुल यांच्या निवासस्थानापासून पोस्टरबाजी केली. यामध्ये ''मी सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे'', ''मोदी, शाह हा राहुल गांधी आहे, झुकणार नाही'', अशा प्रकारची पोस्टरबाजी करण्यात आली. यावर महाराष्ट्रातील भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर निशाणा साधला. आपल्या एका ट्विटमध्ये अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर टीका केली. 

राहुल गांधींनी सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये

राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये. ५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा होऊनही जे स्वातंत्र्यवीर डगमगले नाहीत त्यांचा त्याग आणि तेज ED च्या एका नोटीसने रडकुंडीला आलेल्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे, अशी बोचरी टीका अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर केली आहे. दुसरीकडे, राहुल गांधींच्या चौकशीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे भाजपने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, जे तुरुंगातून जामिनावर आहेत, त्यांनी दिल्लीला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. कारण काय तर, भ्रष्टाचार पकडला गेला आहे. पास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांतील वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. हे लोक उघडपणे एजन्सीवर दबाव आणत आहेत, असा आरोपही स्मृति इराणी यांनी केला.

दरम्यान, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही. एकाही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण फक्त गांधी कुटुंबाला त्रास देण्यासाठी उकरून काढण्यात आले आहे. केंद्र सरकारने राजकीय द्वेष भावनेतून सोनिया आणि राहुल गांधी यांना ईडीच्या नोटिसा पाठविल्या आहेत, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरAtul Bhatkhalkarअतुल भातखळकर