शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भाजपची घोषणा काँग्रेसमुक्तीची अन् योजना काँग्रेसयुक्तचीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 16:44 IST

देशात आज घडीला काँग्रेस बॅकफूटवर गेलेले आहे. मात्र बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमधील नेत्यांना सत्ताधारी पक्षांत चांगलीच मागणी असल्याचे समजते. या पार्शवभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवून विरोधकांना नामोहरम करणारा भारतीय जनता पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने एकट्याने बहुमताचा आकडा पार केला. त्यामुळे देशातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती भाजपमध्ये आली आहे. मात्र अजुनही भाजप मिळालेल्या प्रचंड शक्तीचा वापर काँग्रेसमुक्तीसाठी वाया घालवणार असंच दिसत आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याची हाक दिली आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी काँग्रेसयुक्तच्या नाऱ्याला अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच दिला आहे.

देशातील १८ राज्यांत भाजप सत्तेत आहे. लोकसभेच्या ३०३ जागा भाजपने जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे मित्रपक्ष असो वा नसो भाजपला फरक पडणार नाही. अशा स्थितीत देश चालवणे सोपे होणार आहे. भाजपला येणाऱ्या काळात राज्यसभेतही बहुमत मिळणार असं दिसत आहे. त्यामुळे भाजपने समृद्ध देश, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र अशी घोषणा देणे अपेक्षीत होते. परंतु, तसं होताना दिसत नाही.

महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पद अशी दोन्ही पदे पाटील यांच्याकडे आहेत. पाटील यांनी देखील 'विधानसभा २२०' असं ध्येय निश्चित असल्याचे म्हटले. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा नारा देताना पुढील ८ ते १० दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील होणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे पाटील यांना काँग्रेसमुक्त महाराष्ट्र म्हणायच होती की, काँग्रेसयुक्त भाजप असा सवाल उपस्थित होत आहे.

देशात आज घडीला काँग्रेस बॅकफूटवर गेलेले आहे. मात्र बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमधील नेत्यांना सत्ताधारी पक्षांत चांगलीच मागणी असल्याचे समजते. या पार्शवभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. ही आवक आणखी वाढणार आहे. यामुळे भाजपची आगामी काळातील रणनिती काँग्रेसयुक्त भाजप अशीच होईल, अशी टीका भाजपवर करण्यात येत आहे.