शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

औटीवाडीच्या तलावात भरली पक्ष्यांची शाळा

By admin | Updated: February 26, 2017 17:17 IST

श्रीगोंदा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या औटीवाडी तलावावर परदेशी पाहुणा असलेल्या ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचे आगमन झाले आहे

बाळासाहेब काकडे/ऑनलाइन लोकमतश्रीगोंदा (अहमदनगर), दि. 26 -  शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या औटीवाडी तलावावर परदेशी पाहुणा असलेल्या ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचे आगमन झाले आहे. प्रेमाचे प्रतीक असलेला हा पक्षी गुलाबी रंगाची उधळण करून पर्यटकांना वेगळीच भुरळ घालत आहे. या परदेशी पाहुण्याबरोबर अनेक जलचर पक्ष्यांची या तलावावर सध्याची शाळा भरल्याचे चित्र आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांत औटीवाडी तलावात पाणी नव्हते. त्यामुळे परदेशी पाहुण्याने औटीवाडी तलावाकडे पाठ फिरवली होती. पण गेली वर्षी पाऊस मुबलक झाला. कुकडीचे पाणी आले अन् औटीवाडीचा छोटा जलाशय तुडुंब भरला. त्यामुळे जलचर प्राणी व पक्ष्यांसाठी औटीवाडीचा तलाव पक्ष्यांना नंदनवन ठरले आहे. श्रीगोंदा शहराच्या आसपास बुलबुल, विविध प्रकारचे बगळे, नाना प्रकारच्या घारी, पोपट, चिमणी, कावळे, शिंपी, वटवट्या, तांबट, मैना, दयाळ, कोतवाल (रामोशी, कोळशा), सातभाई, पाणकावळे, धनेश, भारद्वाज, साळुंखी, पिंगळे, हुप्पो, कोकीळ इत्यादी स्थानिक पक्षी वर्षभर नेहमी आढळतात. वर्षा ऋतू संपून शरद ऋतूला प्रारंभ झाला, की श्रीलंका, भुतान, बांगलादेश, म्यानमार, तिबेट, मालदीव, पाकिस्तान या प्रांतांतून उजनी जलाशयाकडे विदेशी पक्षी येत असतात. जाण्या-येण्याच्या प्रवासात काही दिवसांच्या विश्रांतीसाठी मार्गावरील तलावावर मुक्काम ठोकतात. या पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो हा पक्षी आकर्षण ठरतो.औटीवाडीच्या तलावावर फ्लेमिंगो करकोचा, पानकोंबडे, विविध जातीचे बगळे, पाणलव्हा, घारी, गिधाडे आदी पक्ष्यांची शाळा भरली असून, औटीवाडी तलावातील पक्वान्नांची चव चाखण्यासाठी स्पर्धा लागली आहे. औटीवाडी तलावाच्या परिसरातील गहू, ज्वारी, हरभरा, हिरव्या मिरच्या, मका आणि फळे इतर पक्ष्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे हवेत पाण्यात विहार करणाऱ्या मित्रांची चांगलीच चंगळ आहे. काही पक्ष्यांनी औटीवाडी तलावाशेजारील जंगलातील झाडांवर वर्षभरासाठी खोपे, घरटी विनण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे परिसरात पक्ष्यांची वसाहत तयार होणार आहे . (तालुका प्रतिनिधी)  वाळूउपसा डोकेदुखी औटीवाडी तलावावर रात्रीच्या वेळी बेकायदेशीर बेसुमार वाळूउपसा केला जात आहे. वाळूउपसा करण्याऱ्या मशिनरीचा आवाज हा पक्ष्यांची डोकेदुखी ठरत आहे. वाळूउपशाचे चित्र असेच राहिले, तर पक्षी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करतील आणि औटीवाडी तलावातील पक्ष्यांची शाळा बंद पडण्याचा धोका आहे. याकडे पर्यावरणप्रेमींनी लक्ष देण्याची गरज आहे.