शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बिहारी बेरोजगारांना भाजपा शिवसेनेचे नेते महाराष्ट्रात मारहाण करून पिटाळतात - राहूल गांधी

By admin | Updated: October 7, 2015 14:19 IST

भाजपाचे नेते बिहारमध्ये विकासाची भाषा बोलतात परंतु तिकडे महाराष्ट्रामध्ये भाजपा व शिवसेनेचे नेते इथून रोजगारासाठी तिकडे केलेल्या तरुणांना मारहाण करतात

ऑनलाइन लोकमत
शेखपुरा (बिहार), दि. ७ - भाजपाचे नेते बिहारमध्ये विकासाची भाषा बोलतात परंतु तिकडे महाराष्ट्रामध्ये भाजपा व शिवसेनेचे नेते इथून रोजगारासाठी तिकडे केलेल्या तरुणांना मारहाण करतात आणि नरेंद्र मोदी मौन बाळगतात, असा आरोप करत राहूल गांधींनी भाजपा व नरेंद्र मोदींवर प्रचारसभेत तुफानी हल्ला चढवला. अत्यंत आक्रमक शैलीमध्ये मोदींनी निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करत मोदींनी एकही आश्वासन पाळलेले नसून त्यांचे सरकार केवळ श्रीमंत व उद्योपतींसाठी काम करत असल्याचा आरोप केला.
ज्या ज्यावेळी निवडणुका जवळ येतात त्या त्या वेळी भाजपा हिंदू - मुस्ली, मराठी - बिहारी असे वाद पेटवतो असा आरोपही राहूल गांधींनी केला.
 
राहूल गांधींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
 
- बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार येईल असा मला विश्वास आहे. नंतर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा अशा सगळ्या राज्या राज्यांमधून आम्ही भाजपाला हद्दपार करणार.
- भाजपा हिंदू - मुस्लीम, मराठी - बिहारी असं आपसात लढवतं. आमचा बंधुभावावर विश्वास आहे.
- आम्ही तुम्हाला पाणी, रस्ते आणि रोजगार देऊ. आम्ही भलतीसलती अस्वासनं देणार नाही, आणि जे बोलू ते वास्तवात करू.
महाराष्ट्रातले भाजपा शिवसेनेचे नेते बिहार उत्तर प्रदेशातून रोजगारासाठी गेलेल्यांना मारतात आणि पळवून लावतात. मोदींनी कदी याचा विरोध केलाय का?
नरेंद्र मोदी हे फक्त श्रीमंतांसाठी, उद्योगपतींसाठी काम करतात आणि गरीबांकडे, मजुरांकडे, महिलांना किंमत देत नाही. हाच आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे.
- मोदी अमेरिकेत गेले, आणि श्रीमंती कपड्यांचं प्रदर्शन त्यांनी मांडलं. वेगवेगळ्या रंगांचे कपडे ते सारखे बदलत होते. नितिशकुमारांना तुम्ही कधी बघितलंय झगमगत्या कपड्यात. याला साधीराहणी म्हणतात.
- मोदींच्या सभेमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम अशा उद्योगपतींना बघाल परंतु कधी शेतकरी, मजूर, कष्टकरी त्यांच्या सभेत दिसत नाही. मोदी हे भांडवलदारांसाठी काम करतात, गरीबांसाठी नाही.
- विदेशातला काळा पैसा आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू असं सांगितलं. एकाच्या तरी खात्यात पैसे जमा झाले का असे विचारत राहूल गांधींनी बिहारमधल्या सभेत मोदींवर तुफान हल्ला चढवला.
- मोदींनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते, पण सध्या कांदा, टॉमेटो, डाळीचे दर काय आहेत.