शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बिहारी बेरोजगारांना भाजपा शिवसेनेचे नेते महाराष्ट्रात मारहाण करून पिटाळतात - राहूल गांधी

By admin | Updated: October 7, 2015 14:19 IST

भाजपाचे नेते बिहारमध्ये विकासाची भाषा बोलतात परंतु तिकडे महाराष्ट्रामध्ये भाजपा व शिवसेनेचे नेते इथून रोजगारासाठी तिकडे केलेल्या तरुणांना मारहाण करतात

ऑनलाइन लोकमत
शेखपुरा (बिहार), दि. ७ - भाजपाचे नेते बिहारमध्ये विकासाची भाषा बोलतात परंतु तिकडे महाराष्ट्रामध्ये भाजपा व शिवसेनेचे नेते इथून रोजगारासाठी तिकडे केलेल्या तरुणांना मारहाण करतात आणि नरेंद्र मोदी मौन बाळगतात, असा आरोप करत राहूल गांधींनी भाजपा व नरेंद्र मोदींवर प्रचारसभेत तुफानी हल्ला चढवला. अत्यंत आक्रमक शैलीमध्ये मोदींनी निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करत मोदींनी एकही आश्वासन पाळलेले नसून त्यांचे सरकार केवळ श्रीमंत व उद्योपतींसाठी काम करत असल्याचा आरोप केला.
ज्या ज्यावेळी निवडणुका जवळ येतात त्या त्या वेळी भाजपा हिंदू - मुस्ली, मराठी - बिहारी असे वाद पेटवतो असा आरोपही राहूल गांधींनी केला.
 
राहूल गांधींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
 
- बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार येईल असा मला विश्वास आहे. नंतर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा अशा सगळ्या राज्या राज्यांमधून आम्ही भाजपाला हद्दपार करणार.
- भाजपा हिंदू - मुस्लीम, मराठी - बिहारी असं आपसात लढवतं. आमचा बंधुभावावर विश्वास आहे.
- आम्ही तुम्हाला पाणी, रस्ते आणि रोजगार देऊ. आम्ही भलतीसलती अस्वासनं देणार नाही, आणि जे बोलू ते वास्तवात करू.
महाराष्ट्रातले भाजपा शिवसेनेचे नेते बिहार उत्तर प्रदेशातून रोजगारासाठी गेलेल्यांना मारतात आणि पळवून लावतात. मोदींनी कदी याचा विरोध केलाय का?
नरेंद्र मोदी हे फक्त श्रीमंतांसाठी, उद्योगपतींसाठी काम करतात आणि गरीबांकडे, मजुरांकडे, महिलांना किंमत देत नाही. हाच आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे.
- मोदी अमेरिकेत गेले, आणि श्रीमंती कपड्यांचं प्रदर्शन त्यांनी मांडलं. वेगवेगळ्या रंगांचे कपडे ते सारखे बदलत होते. नितिशकुमारांना तुम्ही कधी बघितलंय झगमगत्या कपड्यात. याला साधीराहणी म्हणतात.
- मोदींच्या सभेमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम अशा उद्योगपतींना बघाल परंतु कधी शेतकरी, मजूर, कष्टकरी त्यांच्या सभेत दिसत नाही. मोदी हे भांडवलदारांसाठी काम करतात, गरीबांसाठी नाही.
- विदेशातला काळा पैसा आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू असं सांगितलं. एकाच्या तरी खात्यात पैसे जमा झाले का असे विचारत राहूल गांधींनी बिहारमधल्या सभेत मोदींवर तुफान हल्ला चढवला.
- मोदींनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते, पण सध्या कांदा, टॉमेटो, डाळीचे दर काय आहेत.