शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या स्थिरतेबद्दल सातत्याने टीकाटिपणी करणाऱ्यांना ही द्विवर्षपूर्ती हेच खरेखुरे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 09:40 IST

Two years Of Mahavikas Aghadi: सरकारच्या स्थिरतेबद्दल सातत्याने टीकाटिपणी करणारे विश्लेषक, राजकीय विरोधकांसाठी ही द्विवर्षपूर्ती हेच खरेखुरे उत्तर आहे. वैचारिक भिन्नता असली तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि किमान समान कार्यक्रमाच्या झेंड्याखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

बाळासाहेब थोरात  (महसूल मंत्री)सरकारच्या स्थिरतेबद्दल सातत्याने टीकाटिपणी करणारे विश्लेषक, राजकीय विरोधकांसाठी ही द्विवर्षपूर्ती हेच खरेखुरे उत्तर आहे. वैचारिक भिन्नता असली तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि किमान समान कार्यक्रमाच्या झेंड्याखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. गरीब माणसाची उन्नती हा या सरकारचा मुख्य कार्यक्रम राहिला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, हे आश्वासन जनतेला दिले होते. त्याची पूर्ती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात करण्यात आली. शिवाय ही कर्जमाफी किचकट कागदपत्रांशिवाय आणि तत्काळ देण्यात आली. लोकांचे प्रश्न समजून घेण्याची आणि ते सोडविण्याची संवेदनशीलता असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने कोरोना विरोधात जो लढा दिला त्याचे जगभर कौतुक झाले. याउलट इतर राज्यांमध्ये दिसलेले चित्र विदारक होते, गंगेच्या पात्रात मृतदेह तरंगत होते. 

महसूल विभागाने स्टॅम्प ड्युटीत सवलत दिल्याने गृह खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. ग्राहकांचा फायदा झाला. सरकारला महसूल मिळाला आणि बांधकाम व्यवसायात तेजी आली.

 महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात ई- पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. ८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई- पीक ॲपवर नोंदणी केली आहे. त्याआधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे सुलभ होणार आहे.

दोन वर्षांचा प्रवास सोपा नव्हता. केंद्रातील सत्ताधारी आणि त्यांच्या दबावाखाली असलेल्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी या संस्था, आयटी सेल सर्वांनी आघाडी सरकार पाडण्यासाठी नेत्यांच्या घरावर, राजकारणाशी संबंध नसलेल्या नातेवाइकांच्या घरावर धाडी घातल्या, मात्र सरकार पाडण्यात यश आले नाही. 

काँग्रेसचे सर्व मंत्री लोकहिताच्या दृष्टीने निर्णय घेत आहेत. जनतेलाही काँग्रेसची भूमिका पटलेली आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घवघवीत यश मिळाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी