शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

MPSC परीक्षेत भूषण अहिरे राज्यात पहिला

By admin | Updated: March 16, 2017 20:17 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 2016 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत नाशिकचा भूषण अशोक अहिरे हा राज्यात पहिला आला आहे. तर, साताऱ्याची पूनम पाटील ही राज्यात मुलींमध्ये प्रथम आली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 16 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2016चा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला.या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील भूषण अशोक अहिरे याने राज्यात प्रथम कमांक पटकवला आहे. तर सातारा जिल्ह्यातील पूनम संभाजी पाटील हिने महिलांमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे.भूषण अहिरे अभियांत्रिकी विद्याशाखेचा पदवीधर असून त्याची उपजिल्हाधिकारी पदाकरिता निवड झाली आहे. तर पूनम पाटील हिची पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त या पदाकरिता निवड झाली आहे. एमपीएससीतर्फे 10 एप्रिल 2016 रोजी मुंबईसह राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर राज्य सेवा (पूर्व)परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस 1 लाख 91 हजार 563 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे 1 हजार 575 उमेदवार मुख्य परीक्षा देण्याकरिता यशस्वी ठरले होते. एमपीएससीतर्फे मुंबईसह, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार जिल्हा केंद्रांवर 24 ते 26 सप्टेंबर 2016 या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे 418 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते. पात्र उमेदवारांच्या 16 ते 24 जानेवारी 2017 या कालावधीत मुलाखती घेऊन गुरुवारी अंतिम निकाल एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. एमपीएससीतर्फे रज्यभरातील एकूण 130 राजपत्रिक अधिका-यांच्या पदांसाठी यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात गट अ च्या 71 उमेदवार, गट ब च्या 59 उमेदवारांचा समावेश आहे. यशस्वी उमेदवारांमधून 34 महिला उमेदवारांची व 2 अपंग उमेदवारांची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे.