शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

रायगड संवर्धन प्रकल्पाचे भूमिपूजन महिन्याभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 05:08 IST

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे, ही आनंदाची बाब आहे

संदीप जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे, ही आनंदाची बाब आहे. तथापि महाराजांचे जिवंत स्मारक असलेले गडकिल्ले जतन करण्याचे काम प्रथम झाले पाहिजे. किल्ले रायगड संवर्धन आराखड्यासाठी ६०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील १२५ कोटी रुपये प्रत्यक्षात रायगड संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहेत. याच महिन्यात शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगड संवर्धन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी घोषणा खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केली. भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने, किल्ले रायगडावर मंगळवारी ३४४ वा राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला. त्या वेळी संभाजीराजे बोलत होते. सोहळ्याला विजय शिवतारे, युवराज शहाजीराजे भोसले, महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कोकण विभागाचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.किल्ले रायगडच्या संवर्धनामध्ये शिवभक्तांनी वर्षातून दोन दिवस श्रमदान करून योगदान द्यावे, असे आवाहन खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.शेतकऱ्यांबरोबर राजकारण करू नका. सर्वांनी एकत्र या आणि कर्ज काढून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, असे आवाहन त्यांनी केले. कर्जमाफी करताना अन्य भूधारकांनाच लाभ मिळाला पाहिजे. बहुजन समाजाला आरक्षण देण्याचे पहिले काम छत्रपती शाहू महाराजांनी केले होते. आता सकल मराठा समाजाने एकसंध होऊन आरक्षणाची मागणी लावून धरली पाहिजे. वेळ वाया जाऊ देऊ नका, असे ते म्हणाले.माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगड संवर्धन आराखड्याची माहिती देताना, शिवसमाधी, जगदीश्वर मंदिर, राजदरबार, राजवाडा, सप्तमंदिर आणि जिजाऊ समाधी या ठिकाणची कामे सुरू करण्यात येणार आहेत. प्रकल्पाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी राज्य सरकारने हे काम आपल्याकडे घेतले आहे. शासनाने ३० अभियंते यासाठी नियुक्त असून, त्यांना पुरातत्व विभागाकडून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले. तारखेनुसार साजरा होणारा शिवराज्याभिषेक आता खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे, असे त्यांनी सांगितले. शिवभक्तांचे मत विचारात घेऊनच रायगडचे संवर्धन करण्यात येईल, त्यासाठी कोणता संकल्प सोडण्याची आम्हाला आवश्यकता नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.>पालखी मिरवणूक : छत्रपती संभाजी महाराज यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर, राजसदरेपासून जगदीश्वर मंदिरापर्यंत भव्य अशी पालखी मिरवणूक काढली. विनहेरे येथील सासनकाठी या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरली. या वेळेस पुणे येथील ढोल-ताशांनी या मिरवणुकीची रंगत वाढविली.>पहाटे ध्वजारोहण सोहळामंगळवारी पहाटे साडेपाच वाजता नगारखान्यासमोर भगवा ध्वजारोहण करून सोहळ्याला प्रारंभ झाला. सकाळी ६ वाजेपासून राजसदरेवरील कार्यक्र मांना प्रारंभ झाला. ९.३0 वाजता युवराज छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. त्यानंतर छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक, सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.