शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मराठवाड्यातील 'त्या' आमदारांनी शपथविधीला जाण्यास टाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 18:09 IST

दुसऱ्या पक्षातील आलेल्यांना लगेच मंत्रिपद दिले जाते, मात्र निष्ठावंत यांना डावलले जात असल्याने, शपथविधीपूर्वी मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार नाराज असून शपतविधीवर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सुरु होती.

औरंगाबाद - आयात केलेले आणि विधानपरिषदेवर निवडू गेलेल्या लोकांना मंत्रीपद दिले जात असल्याची नाराजी मराठवाड्यातील शिवसेना आमदारांमध्ये असल्याची चर्चा पहायला मिळत होती. मात्र, नाराजी नसल्याचे व शपथविधीला जाणारच म्हणणारे पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. तर औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी सुद्धा शपथविधीला जाण्यास टाळले.

दुसऱ्या पक्षातील आलेल्यांना लगेच मंत्रिपद दिले जाते, मात्र निष्ठावंत यांना डावलले जात असल्याने, शपथविधीपूर्वी मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार नाराज असून शपतविधीवर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सुरु होती. या विषयी लोकमतशी बोलताना संदीपान भुमरे यांनी, कोणतेही नाराजी नसून आपण शपथविधीला जाणारच असे म्हणाले होते. मात्र, मुंबईत शपथविधी सोहळा पार पडत असताना संजय शिरसाठ आणि भुमरे हे आपल्या मतदार संघात ठाण मांडून बसले होते. त्यामुळे मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने दोन्ही आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे.

संदीपान भुमरे हे पैठण मतदार संघातून चौथ्यांदा आमदार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यातच, आमदार शिरसाठ यांना सुद्धा मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, नव्यानेच राष्ट्रवादीतून शिवसनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषेदेतील आमदार तानाजी सावंत यांना संधी देण्यात आली. त्यामुळे, भुमरे आणि शिरसाठ यांनी शपथविधीकडे पाठ फिरवल्याने शिवसेनेमधील नाराजी स्पष्ट दिसून येत आहे.