शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

भुजबळ OBC नेते होऊ शकत नाही; जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरीभाऊ राठोड म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 12:32 IST

हा लढा मराठा-ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं राठोड यांनी सांगितले. 

यवतमाळ - गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. त्यात जरांगे पाटलांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध करत मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे. राज्यात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या विधानानंतर मराठा-ओबीसी संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. त्यातच आज ओबीसी नेते हरीभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. 

या भेटीनंतर हरीभाऊ राठोड म्हणाले की, हा ऐतिहासिक क्षण आहे. मराठा-ओबीसीत गेल्या दीड महिन्यापासून तणावाचे वातवरण आहे. आम्ही गुण्यागोविंदाने राहत आहोत. मराठा-ओबीसी भाऊ भाऊ आहे. मराठा समाज ओबीसी होणार असेल तर आम्ही भाऊ भाऊ आहोत.छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते होऊ शकत नाही. भटके विमुक्ते, बारा बलुतेदार हा समाज जास्त आहे. त्या समाजाचे नेतृत्व आम्ही करतोय.बारा बलुतेदारांना ओबीसीत वेगळं आरक्षण आहे. देशात रोहिणी आयोग महत्त्वाचा आहे. हा लढा मराठा-ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच १९६७ मध्ये वसंतराव नाईकांनीच कुणबी समाजाला आरक्षण दिले. देशात पहिल्यांदाच ओबीसी आणि भटक्याविमुक्तांना आरक्षण देणारे वसंतराव नाईक आहेत. ही त्यांची कर्मभूमी आहे. वसंतराव नाईक यांना आम्ही विसरू शकत नाही. हिंगोली, जालनात झालेली भाषणे ही तेढ निर्माण करणारी आहेत. टाळ्या मिळवण्यासाठी ठीक आहे परंतु तुम्ही समाजासाठी काय केले? बारा बलुतेदारांसाठी काय केले? भुजबळांनी ओबीसीसाठी कुठल्या योजना आणल्या? अजूनही निधी मिळत नाही.अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यावर आम्ही लढतोय असं हरीभाऊ राठोड यांनी म्हटलं. 

दरम्यान, राज्यात शांतता राहावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज ओबीसी नेत्यांसोबत चर्चा झाली. बारा बलुतेदार, ओबीसी समाजाच्या पाठीशी मराठा समाज कायम आहे. येवल्यातला एक माणूस मराठा आणि ओबीसीत भांडणे लावतोय.एकट्याने ऐकू नका. त्याचे ऐकलं नसते तर बारा बलुतेदार यांच्या वाटोळे झाले नसते. मराठा समाजाला मी शांत राहण्याचं आवाहन गावोगावी करतोय. पडळकर, जानकर, शेंडगे यांना माझी विनंती आहे की, तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. तुम्ही त्यांचे ऐकून मराठा समाजाविरोधात आंदोलन करू नका. ज्याला खायची सवय लागलीय त्याला धक्का लावतोय या नावाखाली वाद लावायची सवय लागलीय. माझा समाज शांततेचे आवाहन स्वीकारतोय. आरक्षण २ दिवस पुढे गेले तरी चालेल परंतु माझ्या समाजाचा घात होऊ द्यायचा नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील