शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ OBC नेते होऊ शकत नाही; जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरीभाऊ राठोड म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 12:32 IST

हा लढा मराठा-ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं राठोड यांनी सांगितले. 

यवतमाळ - गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. त्यात जरांगे पाटलांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध करत मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे. राज्यात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या विधानानंतर मराठा-ओबीसी संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. त्यातच आज ओबीसी नेते हरीभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. 

या भेटीनंतर हरीभाऊ राठोड म्हणाले की, हा ऐतिहासिक क्षण आहे. मराठा-ओबीसीत गेल्या दीड महिन्यापासून तणावाचे वातवरण आहे. आम्ही गुण्यागोविंदाने राहत आहोत. मराठा-ओबीसी भाऊ भाऊ आहे. मराठा समाज ओबीसी होणार असेल तर आम्ही भाऊ भाऊ आहोत.छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते होऊ शकत नाही. भटके विमुक्ते, बारा बलुतेदार हा समाज जास्त आहे. त्या समाजाचे नेतृत्व आम्ही करतोय.बारा बलुतेदारांना ओबीसीत वेगळं आरक्षण आहे. देशात रोहिणी आयोग महत्त्वाचा आहे. हा लढा मराठा-ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच १९६७ मध्ये वसंतराव नाईकांनीच कुणबी समाजाला आरक्षण दिले. देशात पहिल्यांदाच ओबीसी आणि भटक्याविमुक्तांना आरक्षण देणारे वसंतराव नाईक आहेत. ही त्यांची कर्मभूमी आहे. वसंतराव नाईक यांना आम्ही विसरू शकत नाही. हिंगोली, जालनात झालेली भाषणे ही तेढ निर्माण करणारी आहेत. टाळ्या मिळवण्यासाठी ठीक आहे परंतु तुम्ही समाजासाठी काय केले? बारा बलुतेदारांसाठी काय केले? भुजबळांनी ओबीसीसाठी कुठल्या योजना आणल्या? अजूनही निधी मिळत नाही.अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यावर आम्ही लढतोय असं हरीभाऊ राठोड यांनी म्हटलं. 

दरम्यान, राज्यात शांतता राहावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज ओबीसी नेत्यांसोबत चर्चा झाली. बारा बलुतेदार, ओबीसी समाजाच्या पाठीशी मराठा समाज कायम आहे. येवल्यातला एक माणूस मराठा आणि ओबीसीत भांडणे लावतोय.एकट्याने ऐकू नका. त्याचे ऐकलं नसते तर बारा बलुतेदार यांच्या वाटोळे झाले नसते. मराठा समाजाला मी शांत राहण्याचं आवाहन गावोगावी करतोय. पडळकर, जानकर, शेंडगे यांना माझी विनंती आहे की, तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. तुम्ही त्यांचे ऐकून मराठा समाजाविरोधात आंदोलन करू नका. ज्याला खायची सवय लागलीय त्याला धक्का लावतोय या नावाखाली वाद लावायची सवय लागलीय. माझा समाज शांततेचे आवाहन स्वीकारतोय. आरक्षण २ दिवस पुढे गेले तरी चालेल परंतु माझ्या समाजाचा घात होऊ द्यायचा नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील