शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

भातसा, बारवी धरणांनी गाठला तळ; अत्यल्प जलसाठा शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 04:20 IST

भातसात २८ टक्के, तर बारवी धरणात केवळ २३ टक्के पाणीसाठा

सुरेश लोखंडे ठाणे : मुंबई, ठाणे या महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात २७० दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ २८.७१ टक्के, तर ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात अवघा २३.५५ टक्के म्हणजे ५४.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सद्य:स्थितीत शिल्लक आहे. धरणातील या पाण्याची उपलब्धता लक्षात घेता, धरण क्षेत्रात अल्पावधीतच पावसाचे आगमन होणे अपेक्षित आहे. अन्यथा, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे महानगरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांपैकी भातसा हे सर्वात मोठे ब्रिटिशकालीन जलाशय आहे. या धरणाची ९४२.१०० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. यापैकी धरणात सध्या २७०.४९० दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी या धरणात आजच्या दिवशी ३२९.७१ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३५ टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस पडूनही या धरणात अल्पावधीसाठी पुरेल एवढाच पाणीसाठा जलाशयात शिल्लक आहे. बारवी धरणात ४६ दिवस पुरेल एवढाच, म्हणजे २३.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?बारवीची २३३.०७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठवण क्षमता आहे. आज या धरणात ५४.८९ दशलक्ष घनमीटर साठा असून, गेल्या वर्षी हा ८३.२९ दशलक्ष घनमीटर साठा होता. मोडकसागर धरणात ३४.२७ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ४४.१२ टक्के होता.तानसात ९.८४ टक्के साठा आहे, गेल्या वर्षी १६.८९ टक्के होता. बारवीप्रमाणेच ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भाईंदर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणातही ९०.९० दशलक्ष घनमीटर म्हणजे २६.८० टक्के साठा आहे. गेल्या वर्षी या धरणात ३२ टक्के साठा होता.

टाटाच्या मालकीचे असलेल्या या आंध्रा धरणातील पाणी उल्हास नदीत सोडले जाते आणि तेच पाणी ठाणे जिल्ह्यातील शहरांना उपलब्ध करून दिले जाते. पण, या धरणातही यंदा कमी साठा आहे.

त्यामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यांतील शहरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन होण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. अन्यथा, १५ जुलैपर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.