शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भातसा, बारवी धरणांनी गाठला तळ; अत्यल्प जलसाठा शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 04:20 IST

भातसात २८ टक्के, तर बारवी धरणात केवळ २३ टक्के पाणीसाठा

सुरेश लोखंडे ठाणे : मुंबई, ठाणे या महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात २७० दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ २८.७१ टक्के, तर ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात अवघा २३.५५ टक्के म्हणजे ५४.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सद्य:स्थितीत शिल्लक आहे. धरणातील या पाण्याची उपलब्धता लक्षात घेता, धरण क्षेत्रात अल्पावधीतच पावसाचे आगमन होणे अपेक्षित आहे. अन्यथा, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे महानगरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांपैकी भातसा हे सर्वात मोठे ब्रिटिशकालीन जलाशय आहे. या धरणाची ९४२.१०० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. यापैकी धरणात सध्या २७०.४९० दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी या धरणात आजच्या दिवशी ३२९.७१ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३५ टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस पडूनही या धरणात अल्पावधीसाठी पुरेल एवढाच पाणीसाठा जलाशयात शिल्लक आहे. बारवी धरणात ४६ दिवस पुरेल एवढाच, म्हणजे २३.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?बारवीची २३३.०७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठवण क्षमता आहे. आज या धरणात ५४.८९ दशलक्ष घनमीटर साठा असून, गेल्या वर्षी हा ८३.२९ दशलक्ष घनमीटर साठा होता. मोडकसागर धरणात ३४.२७ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ४४.१२ टक्के होता.तानसात ९.८४ टक्के साठा आहे, गेल्या वर्षी १६.८९ टक्के होता. बारवीप्रमाणेच ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भाईंदर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणातही ९०.९० दशलक्ष घनमीटर म्हणजे २६.८० टक्के साठा आहे. गेल्या वर्षी या धरणात ३२ टक्के साठा होता.

टाटाच्या मालकीचे असलेल्या या आंध्रा धरणातील पाणी उल्हास नदीत सोडले जाते आणि तेच पाणी ठाणे जिल्ह्यातील शहरांना उपलब्ध करून दिले जाते. पण, या धरणातही यंदा कमी साठा आहे.

त्यामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यांतील शहरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन होण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. अन्यथा, १५ जुलैपर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.