शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

"आनंद दिघे ज्या खोलीत झोपले त्याचं झालं मंदिर; वर्षातून केवळ २ दिवस उघडतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 14:41 IST

आनंद दिघे यांना आम्ही देव मानतो. त्यांना खोटे चालत नव्हते. पैसे चालत नव्हते. शब्दाला पक्के होते असं भास्कर शिरसाठ म्हणाले.

नाशिक - धर्मवीर आनंद दिघे यांची आज जयंती असून ठिकठिकाणी त्यांना अभिवादन केले जातेय. आनंद दिघे यांना मानणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यापैकीच एक नाशिकचे भास्कर शिरसाठ हे आनंद दिघेंना देव मानत होते. नाशिक रोड परिसरात त्यांचा बंगला आहे. त्या बंगल्यात एक खोली कायम आनंद दिघे यांच्यासाठी ठेवण्यात आली आहे. आजही ही खोली कुणी वापरत नसून हे आमच्यासाठी मंदिर आहे अशी भावना भास्कर शिरसाठ यांनी व्यक्त केली. 

भास्कर शिरसाठ म्हणाले की, आनंद दिघेसाहेब माझ्याकडे २-३ वेळा मुक्कामाला आले होते. ते माझ्यासाठी देव आहेत कारण ते जेलमध्ये असताना मी घरून जेवण त्यांना द्यायचो. जेलमधून सुटताच साहेब माझ्या घरी आले. आईच्या पाया पडले. तेव्हा त्यांनी आईला तुम्हाला ३ मुले आहेत पण मी चौथा मुलगा आहे. तेव्हापासून ते माझ्या आईला आई आणि आम्हाला भाऊ मानायचे. बंगल्याचं काम सुरू असताना चौथ्या भावासाठी खोली बांधली. आज पुण्यतिथी आणि जयंतीलाच ही खोली उघडली जाते. वर्षातून केवळ २-३ दिवस ही रुम खोलली जाते. याच खोलीत आनंद दिघे यांनी २ वेळा मुक्काम केला. याच खोलीत ते पूजा करायचे. त्यांची माळ आजही आहे असं शिरसाठ यांनी सांगितले. 

त्याचसोबत आनंद दिघे यांना आम्ही देव मानतो. त्यांना खोटे चालत नव्हते. पैसे चालत नव्हते. शब्दाला पक्के होते. आमच्याकडे नवरात्र होती तेव्हा त्यांनी स्वखर्चाने सगळं केले. कुणालाही मागण्याची गरज पडत नव्हती. रुद्राक्षाची माळ जपण्याची ती आवड होती. रात्री त्यांना झोप लागत नव्हती. तेव्हा रात्री ही माळ दुकानातून आणली. तेव्हा ती माळ जप केला. ही माळ आजही आमच्याकडे आहे. आनंद दिघे कुणाचेही काम करायचे. अनेक गरजूंना मदत करायचे. आजही त्यांच्या नावाने कामे होतात. त्यांनी सगळ्यांसाठी केले स्वत:साठी काही केले नाही असं भास्कर शिरसाठ म्हणाले. 

दरम्यान, आज जर साहेब असते तर राजकारणात पलटी झाली नसती. साहेबांच्या शब्दापुढे कोणीही जात नव्हते. आज कुणीच फुटले नसते. साहेबांच्या नावाला अनेक जण घाबरायचे. आज जे फुटले त्यांनी हे करायला नको हवं होते. एकनाथ शिंदे यांनी जे केले ते चुकीचे केले. शिवसेना संपवण्यासाठी भाजपाने हे केले अशी खंत भास्कर शिरसाठ यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना