शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:13 IST

प्रथा परंपरेचे रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा हे सांगणे चुकीचे असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं. 

मुंबई - ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. ज्यांना सत्तेची मस्ती, मुजोरी आहे त्यांच्याकडून लोकशाहीची इभ्रत राखणे, त्याची शान राखणे, लोकशाहीची सभ्यता राखणे, लोकशाहीचं संवर्धन करणे ही अपेक्षा नाही असं सांगत उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव कडाडले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची निवड न झाल्याने जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

भास्कर जाधव माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता. ते संसदीय कार्यप्रणालीवर काम करणारे, प्रेम करणारे आहेत. आमची संख्या कमी जास्त विचार करणार नाही असं ते सातत्याने बोलत होते. विरोधी पक्षनेतेपदाबाबत ते सूतोवाच असतील असं मला वाटत होते. परंतु या लोकांचा संसदीय कार्यप्रणाली, घटनेवर विश्वास नाही. केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्याकडे आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच विधानसभा अधिनियमाला जसे सदस्य बांधील आहेत तसे अध्यक्षही बांधील आहेत. अध्यक्षांनी वाट्टेल तो निर्णय घ्यायचा असं नाही. सभागृहातील प्रथा, परंपरा, नियमांप्रमाणे अध्यक्षांनी वागावे. घटनात्मक अधिकार प्रत्येकाला दिले आहेत. त्यामुळे मी कुठलीही गोष्ट चुकीची केली नाही. यांना घटनाच मान्य नाही, लोकशाही मान्य नाही. विधिमंडळ मान्य नाही असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. 

दरम्यान, विरोधी पक्षनेते खुर्ची रिकामी ठेवली काय किंवा पलीकडचे सगळे सदस्य विकत घेऊन बाकीच्या खुर्च्या रिकाम्या केल्या काय..सध्या तेच सुरू आहे. संविधानावर चर्चा करताना मी सांगितले, पूर्वी गोरगरिबांना दारू, मटण देऊन मते घेतली जात होती. आता ईव्हीएममधून मते घेतली जातात. जी नावे यादीत नाही ती मते वाढवली जातात. लोकशाही मातीत घालायचं ठरवलं आहे त्यांच्याकडून फार अपेक्षा नाही. उपाध्यक्षांची निवड तुम्ही करता तुमच्या मनात असते तर विरोधी पक्षनेते निवडही केली असती. माझ्या नावाची तुम्हाला अडचण असेल, मी कायद्यावर बोट ठेवून बोलतो, प्रथा परंपरेवर बोलतो. चुकीचे काय सुरू असेल तर रोखण्याचा प्रयत्न करतो. प्रथा परंपरेचे रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा हे सांगणे चुकीचे असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं. 

लक्षवेधीसाठी पैसे घेतले जातात...

विधानसभेत अधिवेशन काळात लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतले जातात. सभागृहात मी जे बोललो ते खरे आहे. विधान मंडळाचे अधिकारी मला भेटले, त्यांच्याशीही बोललो. नियमानुसार एका दिवसात ३ पेक्षा अधिक लक्षवेधी लावता येत नाहीत. फार तर विशेष बाब म्हणून एखाद दुसरी लक्षवेधी वाढवता येते परंतु सातत्याने २१, २४, २० लक्षवेधी लावल्या जातात. याबाबत का बोलायचे नाही. अध्यक्षांनी निर्णय घेतला म्हणून बोलायचे नाही, परंतु हे का? अध्यक्ष हेसुद्धा एक माणूस आहे. अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला तर त्यावर चर्चा करायची नाही असं सांगितले जाते पण हे बिल्कुल चुकीचे आहे असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला. 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा