शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:13 IST

प्रथा परंपरेचे रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा हे सांगणे चुकीचे असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं. 

मुंबई - ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. ज्यांना सत्तेची मस्ती, मुजोरी आहे त्यांच्याकडून लोकशाहीची इभ्रत राखणे, त्याची शान राखणे, लोकशाहीची सभ्यता राखणे, लोकशाहीचं संवर्धन करणे ही अपेक्षा नाही असं सांगत उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव कडाडले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची निवड न झाल्याने जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

भास्कर जाधव माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता. ते संसदीय कार्यप्रणालीवर काम करणारे, प्रेम करणारे आहेत. आमची संख्या कमी जास्त विचार करणार नाही असं ते सातत्याने बोलत होते. विरोधी पक्षनेतेपदाबाबत ते सूतोवाच असतील असं मला वाटत होते. परंतु या लोकांचा संसदीय कार्यप्रणाली, घटनेवर विश्वास नाही. केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्याकडे आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच विधानसभा अधिनियमाला जसे सदस्य बांधील आहेत तसे अध्यक्षही बांधील आहेत. अध्यक्षांनी वाट्टेल तो निर्णय घ्यायचा असं नाही. सभागृहातील प्रथा, परंपरा, नियमांप्रमाणे अध्यक्षांनी वागावे. घटनात्मक अधिकार प्रत्येकाला दिले आहेत. त्यामुळे मी कुठलीही गोष्ट चुकीची केली नाही. यांना घटनाच मान्य नाही, लोकशाही मान्य नाही. विधिमंडळ मान्य नाही असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. 

दरम्यान, विरोधी पक्षनेते खुर्ची रिकामी ठेवली काय किंवा पलीकडचे सगळे सदस्य विकत घेऊन बाकीच्या खुर्च्या रिकाम्या केल्या काय..सध्या तेच सुरू आहे. संविधानावर चर्चा करताना मी सांगितले, पूर्वी गोरगरिबांना दारू, मटण देऊन मते घेतली जात होती. आता ईव्हीएममधून मते घेतली जातात. जी नावे यादीत नाही ती मते वाढवली जातात. लोकशाही मातीत घालायचं ठरवलं आहे त्यांच्याकडून फार अपेक्षा नाही. उपाध्यक्षांची निवड तुम्ही करता तुमच्या मनात असते तर विरोधी पक्षनेते निवडही केली असती. माझ्या नावाची तुम्हाला अडचण असेल, मी कायद्यावर बोट ठेवून बोलतो, प्रथा परंपरेवर बोलतो. चुकीचे काय सुरू असेल तर रोखण्याचा प्रयत्न करतो. प्रथा परंपरेचे रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा हे सांगणे चुकीचे असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं. 

लक्षवेधीसाठी पैसे घेतले जातात...

विधानसभेत अधिवेशन काळात लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतले जातात. सभागृहात मी जे बोललो ते खरे आहे. विधान मंडळाचे अधिकारी मला भेटले, त्यांच्याशीही बोललो. नियमानुसार एका दिवसात ३ पेक्षा अधिक लक्षवेधी लावता येत नाहीत. फार तर विशेष बाब म्हणून एखाद दुसरी लक्षवेधी वाढवता येते परंतु सातत्याने २१, २४, २० लक्षवेधी लावल्या जातात. याबाबत का बोलायचे नाही. अध्यक्षांनी निर्णय घेतला म्हणून बोलायचे नाही, परंतु हे का? अध्यक्ष हेसुद्धा एक माणूस आहे. अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला तर त्यावर चर्चा करायची नाही असं सांगितले जाते पण हे बिल्कुल चुकीचे आहे असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला. 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा