शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आम्ही नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तीविरोधात लढत आहोत; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 21:30 IST

'राजाची आत्मा EVM, CBI, इनकम टॅक्स आणि ED मध्ये.'

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज(दि.17) मुंबईमधील छत्रपती शिवाजी पार्कवर झाला. या India आघाडीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर विविध मुद्द्यांवरुन जोरदार हल्लाबोल केला. आम्ही एका पक्षाविरोधात किंवा एका व्यक्तीविरोधात लढत नाही आहोत. आम्ही एका शक्तीविरोधात लढत आहोत. या शक्तीने देशातील सर्व केंद्रीय संस्था आपल्या मुठीत ठेवल्या आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.

देशातील माध्यमांवर सरकारचा ताबा

ते पुढे म्हणतात, गेल्या वर्षी मी कन्याकुमारी ते काश्मीर असा 4 हजार किलोमीटर प्रवास केला. ही यात्रा आम्हाला का करावी लागली, कारण देशातील माध्यमांवर एका शक्तीने ताबा मिळवला आहे. देशातील बेरोजगारी, हिंसाचार, महागाई, शेतकऱ्यांचे मुद्दे, अग्नीवीरचे मुद्दे, जवानांचे मुद्दे तुम्हाला मीडियात दिसणार नाहीत. हे सर्व मुद्दे देशासमोर आणण्यासाठी आम्हाला ही यात्रा करावी लागली. या यात्रेत फक्त राहुल गांधी नाही, तर विरोधी पक्षातील सर्व नेते सहभागी झाले होते. 

राजाची आत्मा EVM, CBI आणि ED मध्येआज देशातील प्रमुख मीडियासह सोशल मीडियावरही या शक्तीचे कंट्रोल आहे. अमेरिकेतील कंपन्यांवर दबाव टाकला जातोय आहे. आज आम्ही विविध पक्षातील नेते एकत्र आलो आहोत. आम्ही सर्व एका पक्षाविरोधात किंवा नरेंद्र मोदींविरोधात नाही, तर एका शक्तिविरोधात लढत आहोत. आजच्या राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे, देशातील प्रत्येक सरकारी संस्थेत आहे. या शक्तीने ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स, अशा सर्व प्रमुख संस्था आपल्या मुठीत ठेवल्या आहेत.

अशोक चव्हाणांचा नाव न घेता उल्लेखया महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेते काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपात गेले. जाण्यापूर्वी ते माझ्या आईसमोर रडले. त्यांनी सांगितले की, मला लाज वटत आहे, पण माझ्यात या लोकांविरोधात लढण्याची हिम्मत नाही. मला तुरुंगात जायचे नाही, त्यामुळे मी पक्ष सोडत आहे. हे एकच नाहीत, तर अशाप्रकारे हजारो लोकांना घाबरवले गेले आहे. शिवसेना, राष्ट्रवादीतील लोकही अशाचप्रकारे भाजपात गेले आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राMumbaiमुंबई