शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भन्साळींनी 'पद्मावती'साठी रात्रीची सुरक्षा नाकारली होती

By admin | Updated: March 16, 2017 01:50 IST

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'पद्मावती' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रात्रीच्यावेळी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 -  बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'पद्मावती' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रात्रीच्यावेळी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता, असे राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. 
कोल्हापुरातील पन्हाळगडावरील मसाई पठारावर 'पद्मावती' या सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला विरोध करत काही अज्ञातांनी सेटला मंगळवारी रात्री आग लावली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. 
याप्रकरणी दीपक केसरकर म्हणाले की, संजय लीला भन्साळी यांनी 'पद्मावती' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान रात्रीच्यावेळी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सुरक्षतेसाठी दिवसा एका पोलीस अधिका-यासह पाच हवालदार देण्यात आले होते. मात्र, सेटची जाळपोळ केल्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता एका पोलीस अधिका-यासह 12 हवालदार असणार आहेत. 
यापूर्वीही जयपूरमध्ये 'पद्मावती' सिनेमाच्या सेटवर तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे संजय लीला भन्साळी यांना तेथील चित्रीकरण थांबवावे लागले होते. राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी या सिनेमाच्या सेटवर तोडफोड करून संजय लीली भन्साळी यांना मारहाण सुद्धा केली होती.
तेराव्या शतकात तत्कालीन दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने चितोडगड येथील शिशमहालात राणी पद्मिनीची एक झलक पाहिली होती. यादरम्यान राणी पद्मिनीने या गडावरच जोहार केला होता. या पार्श्वभूमीवर  'पद्मावती'चे चित्रीकरण जयपूर येथे सुरु असताना संघटनेने तोडफोड केली होती. पाठोपाठ चितोडगडमधील ऐतिहासिक शिशमहालातील आरसेही फोडले होते. या घटनेचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटले होते.