शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भानामतीचा संशय जिवावर उठला

By admin | Updated: October 7, 2014 05:33 IST

गेल्या वर्षापासून करणी करीत असल्याच्या संशयावरून एका विवाहितेस बहीण-भावाने पेटवून दिल्याची घटना माजलगाव तालुक्यातील तालेखड येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली

माजलगाव (बीड) : गेल्या वर्षापासून करणी करीत असल्याच्या संशयावरून एका विवाहितेस बहीण-भावाने पेटवून दिल्याची घटना माजलगाव तालुक्यातील तालेखड येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडित महिलेचा मृत्यू झाला.नीता आकाश डोंगरे (१९) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, तिला जुळी मुले आहेत़ दोन वर्षांपूर्वी नीताचा विवाह झाला होता़ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना नीताने तहसीलदार व पोलिसांना जबाब दिला़ त्यानुसार शेजाऱ्यांनी करणी करीत असल्याचा आरोप माझ्यावर केला होता. त्यानंतर प्रमोद गायकवाड, सुषमा गायकवाड, मधू, देविनंदा यांनी गेल्या महिन्यापासून करणी करीत असल्याच्या संशयावरून त्रास देण्यास सुरुवात केली.भानामती, करणी करीत असल्यामुळे कपड्यांना छिद्र पडत असल्याचा दावा शेजाऱ्यांनी केला होता़ रविवारी नीता यांचे आई-वडील त्यांना तालखेड येथे भेटण्यास आले होते़ सायंकाळी सातच्या सुमारास नीताच्या आई-वडिलांना सोडण्यासाठी तिचे सासू-सासरे गेले असल्याने नीता घरात एकटीच होती.या संधीचा फायदा घेत प्रमोद गायकवाड व मधू गायकवाड त्यांच्या घरात गेले व घरातील डब्यामधील रॉकेल अंगावर ओतून त्यांनी नीता यांस पेटवून दिले. नीता यांच्या जबानीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी तीन वाजता नीताचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्रमोद गायकवाड वगळता ४ महिलांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)