शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : ईव्हीएमच्या बिघाडामुळे मतदानाविना परतले मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 14:31 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीला ईव्हीएमच्या बिघाडाचे ग्रहण लागलेले आहे. सकाळच्या सत्रात ११ वाजतापर्यंत केवळ १३.९० तर दुपारी १ वाजतापर्यंत केवळ २० टक्के मतदान झाले आहे.

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीला ईव्हीएमच्या बिघाडाचे ग्रहण लागलेले आहे. सकाळच्या सत्रात ११ वाजतापर्यंत केवळ १३.९० तर दुपारी १ वाजतापर्यंत केवळ २० टक्के मतदान झाले आहे. दुपारी ४४ अंश तापमानामुळे मतदान केंद्रावर कुणीही दिसत नसल्याचे चित्र आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील २१० ते २२५ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडलेल्या असून काहींमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु २,१४९ मतदान केंद्रासाठी केवळ पाच अभियंते असून त्यांची पळापळ सुरू आहे. याची राष्ट्रवादी व भारिपने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तक्रार करून मतदानाची वेळ वाढवून मागितली आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे अत्यल्प प्रतिसाद मिळत असून सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी मतदानाची वेळ ७ वाजता करण्यात आली. परंतु ९ वाजतापर्यंत दोन तासात केवळ ५.९८ टक्के मतदान झाले. वाढत्या तापमानामुळे मतदानासाठी कुणी फारसे बाहेत पडत नसल्याचे चित्र आहे.दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केली होती. आज सकाळी राष्ट्रवादीचे धनंजय दलाल यांनी हा सर्व प्रकार जिल्हाधिका-यांना भेटून सांगितला. गोंदिया जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यात ११० ते १२५ मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील कुंभली, आतेगाव, मोहाडी तालुक्यांतील ताडगाव, मोहगाव देवी येथे दोनदा मशिन बंद पडली. तुमसर तालुक्यातील मांढळ, खापा, हिंगणा, खरबी, पवनी तालुक्यातील धानोरी, सिंदपुरी, रूयाळ, बेटाळा, शिंगोरी, लाखांदूर तालुक्यातील किन्हाळा, चिंचोली, खैरना, मासळ, मोहरणा, डोकेसरांडी, मांढळ, पारडी, मुरमाडी, पाहुणगाव, पिंपळगाव, मेंढा, किरमटी, राजनी, टेंभरी येथील ईव्हीएममध्ये बिघाड राहिला.भंडाराजवळील खोकरला येथील मतदान केंद्रावरील मशीन बिघडल्याने मतदारांनी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना या गैरप्रकाराची माहिती दिली. त्यावर जिल्हाधिकारी काळे यांनी याची दखल घेऊन दुस-या मशिनची व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित मतदान केंद्राधिका-यांना देणार असल्याचे सांगितले. अशाच तक्रारी सर्वच १५ ही तालुक्यातून येत आहेत. वाढत्या तापमानामुळे ईव्हीएम मशीन हॅक होत असल्याचा बचाव निवडणूक अधिका-यांकडून केला जात आहे. याची निवडणूक आयोगाकडून चाचणी का? घेण्यात आली नाही. चाचणी घेतली असेल तर दोष कसा आढळून आला, असा प्रश्न माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.

ईव्हीएम बंद, मतदानासाठी वेळ वाढवून देण्याची पालकमंत्री बावनकुळे यांची मागणीभंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोट निवडणुकीत आज होत असलेल्या मतदानात ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी अनेक मतदान केंद्रावरून येत आहेत. त्यामुळे हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. नादुरुस्त ईव्हीएम मशीन त्वरित दुरुस्त करून मतदानाची वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून केली आहे

टॅग्स :Electionनिवडणूक