शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

भंडारा- गोंदियाप्रकरणी राष्ट्रवादीची मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 04:16 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मुंबई - भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मागणी केल्यानंतर कृषीमंत्र्यांनी धानावर पडलेल्या तुडतुड्या रोगावर नुकसान भरपाई देण्याची कबुली दिली होती. परंतु मधल्या ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये अंमलबजावणी करण्यात आली नाही आणि आता भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू असताना गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मे २०१८ रोजी सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांना २६ ते २८ मे या कालावधीपासून ते १५ जुनपर्यंत शेतकºयांना नुकसानीची भरपाई वाटप करण्यासाठी पूर्णवेळ बँका सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.नुकसान भरपाई देण्याचा निर्णय डिसेंबर २०१७ रोजीचा असताना त्याची अंमलबजावणी आचारसंहितेच्या काळात केली जात आहे. निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे, असे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.अनेक ईव्हीएम मशिन्स या टेस्टिंगच्यावेळी दोषमुक्त आढळल्या असून या सर्व मशिन्स सुरत, गुजरात येथून मागविण्यात आल्या आहेत. तरी पोटनिवडणुकीत सुरत, गुजरात येथून आलेल्या मशिन्स न वापरता महाराष्ट्रातील उपलब्ध असलेल्या ईव्हीएम मशिन्सचा वापर करावा. या निवडणुकीमध्ये व्हीव्हीएमपीएटी मशिनच्या वापर करण्यात येणार आहे. अनेक व्हीव्हीएमपीएटी मशिन अत्यंत धीम्या गतीने चालणाºया आहेत. मतदारांकरिता पावती महत्त्वाची आहे. तरी निकाल जाहीर करण्यापूर्वी व्हीव्हीपीएटी मशिनच्या पावत्यांचीही मोजणी करण्यात यावी, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक