शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

राज्यातून होणार सर्वोत्कृष्ट पोलीस घटकाची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 08:00 IST

वार्षिक कामगिरीवर मूल्यमापन; मुख्यालयाची अभिनव अवॉर्ड योजना. दोन उच्चस्तरीय समितीकडून पारदर्शक पद्धतीने मूल्यांकन करून त्यांची निवड केली जाईल.

- जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस घटकांमधून आता सर्वोत्कृष्ट पोलीस दल (बेस्ट युनिट ऑफ स्टेट) ठरविले जाणार आहे. वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या घटकांना विषयनिहाय पाच पारितोषिक देण्यात येणार आहेत.

दोन उच्चस्तरीय समितीकडून पारदर्शक पद्धतीने मूल्यांकन करून त्यांची निवड केली जाईल. मुंबई आणि राज्यातील उर्वरित अन्य घटकांची दोन विभागांत वर्गीकरण केले जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, सचिन वाझे यांच्यावरील गैरकृत्ये भ्रष्टाचारासंबंधीच्या आरोप-प्रत्यारोपामुळे खात्याचे खच्चीकरण झाले आहे, त्यामुळे चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकारी-अंमलदारांचे मनोबल वाढावे, यासाठी अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह यांनी ही कल्पना राबविली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीतील अभ्यास करून, दरवर्षी पुरस्कारासाठी घटकांची निवड केली जाणार आहे.

..असे आहेत पुरस्कार आणि त्यासाठीचे निकषबेस्ट युनिट इन स्टेट प्रथम व द्वितीय, आणि बेस्ट ॲडमिनिन्स्ट्रेट, बेस्ट टेक्नॉलॉजी, असे पारितोषिक दिले जाणार असून, त्यासाठी एका कॅलेंडर वर्षात दाखल गुन्हे, उकल, कायदा व सुव्यवस्था, सामाजिक, जातीय सलोखा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, महिला व बाल सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आदी एकूण विविध २० निकषांवरून घटकांचे मूल्यांकन केले जाणार आहे. त्यासाठी एकूण ७०० गुण असणार असून, सर्वाधिक गुण मिळविणारे घटक विजेते ठरतील. सीआयडीचे प्रमुख व एडीजी (लॉ अँड ऑर्डर) यांच्या नेतृत्वाखाली दोन समिती राज्यातील ४५ पोलीस घटकांचे मूल्यमापन करेल.

नकारात्मक बाबींचीही होणार नोंदपोलीस घटकातील चांगल्या कामगिरीबरोबर भ्रष्टाचाराची प्रकरणे, कोठडीतील मृत्यू, जातीय दंगली आणि फरार आरोपीच्या प्रकरणाबाबत अवमूल्यन केले जाणार आहे. प्रत्येक मुद्द्यावरून प्रत्येकी १० गुण कमी केले जाणार आहेत.

लवकरच विजेते ठरणारएका वर्षात आयपीसीअंतर्गत दाखल सहा हजार गुन्हे व त्याहून अधिक गुन्हे असलेले घटक अशा दोन प्रकारांमध्ये विभागणी केली असून, त्या व्यतिरिक्त मुंबई आयुक्तालयाची स्वतंत्रपणे विजेते ठरविले जाणार आहेत. येत्या ८ ते १० दिवसांत गतवर्षीच्या कामगिरीच्या निकषावर बेस्ट युनिटची ननिवड जाहीर केली जाईल. अधिकारी, अंमलदारांमध्ये उत्साह वाढविणे हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे.- राजेंद्र सिंग, अप्पर महासंचालक, कायदा व सुव्यवस्था 

टॅग्स :Policeपोलिस