शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातून होणार सर्वोत्कृष्ट पोलीस घटकाची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 08:00 IST

वार्षिक कामगिरीवर मूल्यमापन; मुख्यालयाची अभिनव अवॉर्ड योजना. दोन उच्चस्तरीय समितीकडून पारदर्शक पद्धतीने मूल्यांकन करून त्यांची निवड केली जाईल.

- जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस घटकांमधून आता सर्वोत्कृष्ट पोलीस दल (बेस्ट युनिट ऑफ स्टेट) ठरविले जाणार आहे. वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या घटकांना विषयनिहाय पाच पारितोषिक देण्यात येणार आहेत.

दोन उच्चस्तरीय समितीकडून पारदर्शक पद्धतीने मूल्यांकन करून त्यांची निवड केली जाईल. मुंबई आणि राज्यातील उर्वरित अन्य घटकांची दोन विभागांत वर्गीकरण केले जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, सचिन वाझे यांच्यावरील गैरकृत्ये भ्रष्टाचारासंबंधीच्या आरोप-प्रत्यारोपामुळे खात्याचे खच्चीकरण झाले आहे, त्यामुळे चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकारी-अंमलदारांचे मनोबल वाढावे, यासाठी अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह यांनी ही कल्पना राबविली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीतील अभ्यास करून, दरवर्षी पुरस्कारासाठी घटकांची निवड केली जाणार आहे.

..असे आहेत पुरस्कार आणि त्यासाठीचे निकषबेस्ट युनिट इन स्टेट प्रथम व द्वितीय, आणि बेस्ट ॲडमिनिन्स्ट्रेट, बेस्ट टेक्नॉलॉजी, असे पारितोषिक दिले जाणार असून, त्यासाठी एका कॅलेंडर वर्षात दाखल गुन्हे, उकल, कायदा व सुव्यवस्था, सामाजिक, जातीय सलोखा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, महिला व बाल सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आदी एकूण विविध २० निकषांवरून घटकांचे मूल्यांकन केले जाणार आहे. त्यासाठी एकूण ७०० गुण असणार असून, सर्वाधिक गुण मिळविणारे घटक विजेते ठरतील. सीआयडीचे प्रमुख व एडीजी (लॉ अँड ऑर्डर) यांच्या नेतृत्वाखाली दोन समिती राज्यातील ४५ पोलीस घटकांचे मूल्यमापन करेल.

नकारात्मक बाबींचीही होणार नोंदपोलीस घटकातील चांगल्या कामगिरीबरोबर भ्रष्टाचाराची प्रकरणे, कोठडीतील मृत्यू, जातीय दंगली आणि फरार आरोपीच्या प्रकरणाबाबत अवमूल्यन केले जाणार आहे. प्रत्येक मुद्द्यावरून प्रत्येकी १० गुण कमी केले जाणार आहेत.

लवकरच विजेते ठरणारएका वर्षात आयपीसीअंतर्गत दाखल सहा हजार गुन्हे व त्याहून अधिक गुन्हे असलेले घटक अशा दोन प्रकारांमध्ये विभागणी केली असून, त्या व्यतिरिक्त मुंबई आयुक्तालयाची स्वतंत्रपणे विजेते ठरविले जाणार आहेत. येत्या ८ ते १० दिवसांत गतवर्षीच्या कामगिरीच्या निकषावर बेस्ट युनिटची ननिवड जाहीर केली जाईल. अधिकारी, अंमलदारांमध्ये उत्साह वाढविणे हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे.- राजेंद्र सिंग, अप्पर महासंचालक, कायदा व सुव्यवस्था 

टॅग्स :Policeपोलिस