शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

जिल्ह्यात सर्वत्र जमके बरसला

By admin | Updated: September 22, 2016 03:24 IST

यंदा वरुणराजाने ठाणे जिल्ह्यावर चांगलीच कृपादृष्टी केली असून या मोसमात पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आहे.

ठाणे : यंदा वरुणराजाने ठाणे जिल्ह्यावर चांगलीच कृपादृष्टी केली असून या मोसमात पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आहे. यंदा पावसाने ठाणे जिल्ह्यातील सरासरीचा पल्लाही ओलांडला आहे. जिल्ह्यातील ७ पैकी ठाण्यात १२६, कल्याण १०८, मुरबाड १०७ टक्के असा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल साडेपाच हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. दुसरीकडे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी ठाणे- पालघरातील सर्वच धरणे ओव्हरफलो झाली आहेत. मागील तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पालघरातील धामणी, कवडास, वांद्री या धरणांसह ठाण्यातील मोडकसागर आणि बारवी धरण १०० टक्के भरले होते. मात्र, ठाणे जिल्ह्यातील भातसा आणि तानसा धरणे भरायची शिल्लक होती. तीही सध्या चालू असलेल्या परतीच्या पावसात सरासरी भरून झाली आहेत. दरम्यान, परतीच्या पावसाची बुधवारीही दिवसभर रिपरिप सुरू होती. शहरातील काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले. त्यामुळे वाहतूककोंडीही झाली होती. वरुणराजाचा सध्याचा मूड पाहता सप्टेंबर संपेपर्यंत आकडेवारीच्या नवीन अध्यायाची नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, असे असले तरी येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार अतिवृष्टीची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळवण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठाण्यात मागील २४ तासांत ७२ मिमी पावसाची नोंद झाली असून शहराच्या विविध भागांत रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक भागांत वाहतूककोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. आगीची एक, शॉर्टसर्किटची एक आणि एका ठिकाणी प्लास्टर पडल्याची घटना घडली आहे. परंतु, येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून त्यानुसार त्या ठिकाणच्या महापालिका, नगरपालिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. गेल्या वर्षीच्या पावसाच्या तुलनेत यंदा ठाणे-मुंबईला पाणीपुरवठा करणारी जवळपास सर्वच धरणे वेळेत दुथडी भरून वाहू लागली. त्यामुळे यंदा तरी ठाणे-मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.>तालुक्यात आतापर्यंतचा सरासरी पाऊस ठाणे -३ हजार १२१ मिमी (१२६.४६), कल्याण २ हजार ६७४ मिमी (१०८.९६), मुरबाड - २ हजार ५११ मिमी (१०७.८५), उल्हासनगर - २ हजार ३६८ मिमी (९२.६३), अंबरनाथ - २ हजार २८६ मिमी (९६.७१), भिवंडी - २ हजार ४१६ मिमी (९९.७७), शहापूर - २ हजार १२५ मिमी (८३.१५), एकूण पाऊस - १७ हजार ५०३ मिमी (१०२.०६) (सर्व आकडे टक्क्यांत)