शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

जिल्ह्यात सर्वत्र जमके बरसला

By admin | Updated: September 22, 2016 03:24 IST

यंदा वरुणराजाने ठाणे जिल्ह्यावर चांगलीच कृपादृष्टी केली असून या मोसमात पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आहे.

ठाणे : यंदा वरुणराजाने ठाणे जिल्ह्यावर चांगलीच कृपादृष्टी केली असून या मोसमात पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आहे. यंदा पावसाने ठाणे जिल्ह्यातील सरासरीचा पल्लाही ओलांडला आहे. जिल्ह्यातील ७ पैकी ठाण्यात १२६, कल्याण १०८, मुरबाड १०७ टक्के असा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल साडेपाच हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. दुसरीकडे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी ठाणे- पालघरातील सर्वच धरणे ओव्हरफलो झाली आहेत. मागील तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पालघरातील धामणी, कवडास, वांद्री या धरणांसह ठाण्यातील मोडकसागर आणि बारवी धरण १०० टक्के भरले होते. मात्र, ठाणे जिल्ह्यातील भातसा आणि तानसा धरणे भरायची शिल्लक होती. तीही सध्या चालू असलेल्या परतीच्या पावसात सरासरी भरून झाली आहेत. दरम्यान, परतीच्या पावसाची बुधवारीही दिवसभर रिपरिप सुरू होती. शहरातील काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले. त्यामुळे वाहतूककोंडीही झाली होती. वरुणराजाचा सध्याचा मूड पाहता सप्टेंबर संपेपर्यंत आकडेवारीच्या नवीन अध्यायाची नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, असे असले तरी येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार अतिवृष्टीची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळवण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठाण्यात मागील २४ तासांत ७२ मिमी पावसाची नोंद झाली असून शहराच्या विविध भागांत रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक भागांत वाहतूककोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. आगीची एक, शॉर्टसर्किटची एक आणि एका ठिकाणी प्लास्टर पडल्याची घटना घडली आहे. परंतु, येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून त्यानुसार त्या ठिकाणच्या महापालिका, नगरपालिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. गेल्या वर्षीच्या पावसाच्या तुलनेत यंदा ठाणे-मुंबईला पाणीपुरवठा करणारी जवळपास सर्वच धरणे वेळेत दुथडी भरून वाहू लागली. त्यामुळे यंदा तरी ठाणे-मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.>तालुक्यात आतापर्यंतचा सरासरी पाऊस ठाणे -३ हजार १२१ मिमी (१२६.४६), कल्याण २ हजार ६७४ मिमी (१०८.९६), मुरबाड - २ हजार ५११ मिमी (१०७.८५), उल्हासनगर - २ हजार ३६८ मिमी (९२.६३), अंबरनाथ - २ हजार २८६ मिमी (९६.७१), भिवंडी - २ हजार ४१६ मिमी (९९.७७), शहापूर - २ हजार १२५ मिमी (८३.१५), एकूण पाऊस - १७ हजार ५०३ मिमी (१०२.०६) (सर्व आकडे टक्क्यांत)