शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सत्तेत बसलेल्या घटकांकडून प्रोत्साहन मिळत असल्यानं जातीवाचक संघटना बाळसे धरतायत- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 23:08 IST

महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य हरवले जात आहे. विद्वेष वाढत आहे. दुपारी एकत्र डबा खाणारे चार मित्रही जातीचा विचार करत आहेत. माणसा-माणसात जात, धर्म, भाषा यातून दिसणारी कटुता घालविली पाहिजे. पण आज जातीवाचक संघटना बाळसे धरत आहेत. त्याला सत्तेवर बसलेल्या घटकांकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

पुणे: महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य हरवले जात आहे. विद्वेष वाढत आहे. दुपारी एकत्र डबा खाणारे चार मित्रही जातीचा विचार करत आहेत. माणसा-माणसात जात, धर्म, भाषा यातून दिसणारी कटुता घालविली पाहिजे. पण आज जातीवाचक संघटना बाळसे धरत आहेत. त्याला सत्तेवर बसलेल्या घटकांकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप पवारांनी केला आहे. मात्र, शाहू- फुले- आंबेडकरांचा महाराष्ट्र या रस्त्याने जाणार नाही, असे सांगताना जातींमधील कडवटपणा दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगताना पवार म्हणाले. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने शोध मराठी मनाचा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बृहन्ममहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) प्रांगणावर तब्बल एक तास त्रेचाळीस मिनिटे रंगलेल्या या मुलाखतीला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.मुंबई, पुण्यातील अर्थकारणावर कब्जा करण्याचा प्रयत्न काही घटक करत आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम देशाचे नेतृत्व करीत आहे. पण कोणी वरून खाली उतरला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही , असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष ठणकावून सांगत शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी मुंबई तोडण्याच्या षड्यंत्र असल्याचे केलेल्या आरोपावर सहमती दर्शविली.महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर शरद पवार यांना बोलते करताना राज ठाकरे यांनी संवादाच्या गाडीचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेनेच रोखण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाणांच्या पिढीचे मूल्याधिष्ठित राजकारण सध्या दिसत नाही, या राज ठाकरे यांच्या प्रश्नावर पवार यांनी मोदींवर हल्ला चढविला. ते म्हणाले, सध्या राजकारणात वैयक्तिक हल्ले केले जात असताना आपण कुठल्या पदावर आहोत याचेही भान राखण्यात येत नाही. जवाहरलाल नेहरुंनी या देशासाठी काहीच केलं नाही असे म्हणणे चुकीचे आहे. या देशातील लोकशाहीला 12व्या शतकात सुरुवात झाली असे वक्तव्य सभागृहात केले गेले. मग इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीत काय लोकशाही नांदत होती का? अटल बिहारींच्या काळात सभागृहात सर्वांचा सन्मान राखला जात असे. तसा आदर्श त्यांनी संसदेत घालून दिला होता. मात्र आताचे चित्र बदललेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करायला हवा. वैचारिक मतभेद असतील तरी टोकाची भूमिका घेऊ नये हे पथ्य आज देशात पाळले जात नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने महाराष्ट्र एकत्र येईल. तो चिरकाल ठेवणारा विचार आहे, यामध्ये शंका नाही. महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी शाहू, फुले आणि आंबेडकर यांनी खूप काम केले आहे. सामाजिक ऐक्य टिकून ठेवले आहे. राज यांना पवार म्हणाले, सामाजिक ऐक्याच्या लढाईत माझ्या बरोबर तुम्हीही असणार आहात कारण तुमच्यावरही तेच संस्कार आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांनी नेहमीच ठाकरी भाषेतून समाजातील विघातक प्रवृत्तींवर प्रहार केले. बाळासाहेब ठाकरे यांनीही कधीही जात पाहिली नाही. त्यामुळेच जातीची पाच हजार मतेही नसणाºया चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या नेत्याला मंत्रीपद दिले, पाच वेळा लोकसभेवर पाठविले.राज्य चालविण्याइतके देश चालविणे सोपे नाहीनरेंद्र मोदी अत्यंत कष्ट करतात ही त्यांची जमेची बाजू आहे. गुजरातमध्ये त्याचा त्यांना फायदा झाला. पण गुजरात चालविणे आणि भारत चालविणे यामध्ये फरक आहे. देश चालविण्यासाठी टीम म्हणून काम करावे लागते. देशाच्या विविध भागांतून तज्ज्ञ गोळा करावे लागतात. मात्र, सध्याच्या सरकारला हे जमत नाही, असे दिसत आहे. कोणालाही काही करावेसे वाटले तर त्यांना विचारून घ्यावे लागेल, अशी चर्चा दिल्लीत ऐकायला मिळते. हे योग्य नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे