शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

तिथं हैवानांचा हैदोस, बीडला केंद्रशासित करा; ठाकरे गटाच्या नेत्याची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:48 IST

बीड जिल्ह्यात हैवानांचा हैदोस सुरू आहे. पोलीस प्रशासन त्यावर आळा घालण्यास अयशस्वी ठरलं आहे असं माजी खासदारांनी म्हटलं.

मुंबई - सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि वाल्मिक कराड याच्या गुन्हेगारीमुळे सध्या राज्याच्या वर्तुळात बीड जिल्ह्याचे नाव चर्चेत आहे. बीडमधील गुन्हेगारी, जातीयवाद, दहशत येथील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या अजब मागणीने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बीडमधील घटनांवर बोलताना विनायक राऊतांनी बीडला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली. राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही आहेत, ते कोणालाही सोडणार नाही असं सांगतात परंतु गुंडांना पायबंदही घालत नाही. अशात जर बीड वासियांचे जीवन सुरळीत चालवायचं असेल, इथल्या लोकप्रतिनिधींना काम करण्यासाठी चांगले वातावरण करायचे असेल तर बीडमधील संपूर्ण शासन व्यवस्था केंद्रशासित करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय बीड जिल्ह्यात हैवानांचा हैदोस सुरू आहे. पोलीस प्रशासन त्यावर आळा घालण्यास अयशस्वी ठरलं आहे. बीडला थेट केंद्रातून शासन निर्माण करण्याची आवश्यकता आहे तरच बीडला शांतता आणि सुव्यवस्था नांदेल. अन्यथा लोकप्रतिनिधी आणि सरपंचाचे अनेक बळी तिथे जाण्याची शक्यता आहे अशी भीतीही माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सरपंच हत्याकांड प्रकरणी सरकार अजिबात गंभीर नाही. बीड,परभणीमध्ये रोज नवेनवे पैलू दिसून येत असून नवीन माहिती समोर येत आहे तरीही मुख्यमंत्री गंभीर नाहीत. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, मात्र तो ही सरकार घेत नाहीत. त्यामुळे एकंदरीत हे सरकार निगरगठ्ठ झाल्याचं दिसून येते. ज्या क्रूर पद्धतीने देशमुख यांना चार तास मारलं गेलं त्याचा मी निषेध करते. जनावराला अस मारलं तर अंगावर शहारे येतात, हे तर माणसाला मारत आहेत असं सुरेश धस अस म्हणाले होते आणि हे असं बीड जिल्ह्यात पहिल्यांदा झालं नाही, बीड जिल्हा हा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेले मात्र आता त्यांना हे भोगावं लागणार असून त्यांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.

धनंजय मुंडेंनी राजीनामाच द्यावा

संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा आणि दोषींना अटक करावी अशी मागणी करत दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. जवळपास २ तासांनी धनंजय देशमुख खाली उतरले मात्र तोपर्यंत सर्व ग्रामस्थ, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित जमून धनंजय देशमुखांना टाकीवरून खाली उतरण्याची विनवणी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप श्रीरसागर यांनी केली. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणVinayak Rautविनायक राऊत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस