शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
2
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
3
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
5
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
6
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
7
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
8
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
9
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
10
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
11
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
12
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
13
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
14
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
15
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
16
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
17
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
18
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
19
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

तिथं हैवानांचा हैदोस, बीडला केंद्रशासित करा; ठाकरे गटाच्या नेत्याची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:48 IST

बीड जिल्ह्यात हैवानांचा हैदोस सुरू आहे. पोलीस प्रशासन त्यावर आळा घालण्यास अयशस्वी ठरलं आहे असं माजी खासदारांनी म्हटलं.

मुंबई - सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि वाल्मिक कराड याच्या गुन्हेगारीमुळे सध्या राज्याच्या वर्तुळात बीड जिल्ह्याचे नाव चर्चेत आहे. बीडमधील गुन्हेगारी, जातीयवाद, दहशत येथील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या अजब मागणीने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बीडमधील घटनांवर बोलताना विनायक राऊतांनी बीडला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली. राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही आहेत, ते कोणालाही सोडणार नाही असं सांगतात परंतु गुंडांना पायबंदही घालत नाही. अशात जर बीड वासियांचे जीवन सुरळीत चालवायचं असेल, इथल्या लोकप्रतिनिधींना काम करण्यासाठी चांगले वातावरण करायचे असेल तर बीडमधील संपूर्ण शासन व्यवस्था केंद्रशासित करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय बीड जिल्ह्यात हैवानांचा हैदोस सुरू आहे. पोलीस प्रशासन त्यावर आळा घालण्यास अयशस्वी ठरलं आहे. बीडला थेट केंद्रातून शासन निर्माण करण्याची आवश्यकता आहे तरच बीडला शांतता आणि सुव्यवस्था नांदेल. अन्यथा लोकप्रतिनिधी आणि सरपंचाचे अनेक बळी तिथे जाण्याची शक्यता आहे अशी भीतीही माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सरपंच हत्याकांड प्रकरणी सरकार अजिबात गंभीर नाही. बीड,परभणीमध्ये रोज नवेनवे पैलू दिसून येत असून नवीन माहिती समोर येत आहे तरीही मुख्यमंत्री गंभीर नाहीत. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, मात्र तो ही सरकार घेत नाहीत. त्यामुळे एकंदरीत हे सरकार निगरगठ्ठ झाल्याचं दिसून येते. ज्या क्रूर पद्धतीने देशमुख यांना चार तास मारलं गेलं त्याचा मी निषेध करते. जनावराला अस मारलं तर अंगावर शहारे येतात, हे तर माणसाला मारत आहेत असं सुरेश धस अस म्हणाले होते आणि हे असं बीड जिल्ह्यात पहिल्यांदा झालं नाही, बीड जिल्हा हा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेले मात्र आता त्यांना हे भोगावं लागणार असून त्यांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.

धनंजय मुंडेंनी राजीनामाच द्यावा

संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा आणि दोषींना अटक करावी अशी मागणी करत दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. जवळपास २ तासांनी धनंजय देशमुख खाली उतरले मात्र तोपर्यंत सर्व ग्रामस्थ, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित जमून धनंजय देशमुखांना टाकीवरून खाली उतरण्याची विनवणी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप श्रीरसागर यांनी केली. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणVinayak Rautविनायक राऊत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस