शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
3
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
4
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल

तिथं हैवानांचा हैदोस, बीडला केंद्रशासित करा; ठाकरे गटाच्या नेत्याची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:48 IST

बीड जिल्ह्यात हैवानांचा हैदोस सुरू आहे. पोलीस प्रशासन त्यावर आळा घालण्यास अयशस्वी ठरलं आहे असं माजी खासदारांनी म्हटलं.

मुंबई - सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि वाल्मिक कराड याच्या गुन्हेगारीमुळे सध्या राज्याच्या वर्तुळात बीड जिल्ह्याचे नाव चर्चेत आहे. बीडमधील गुन्हेगारी, जातीयवाद, दहशत येथील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या अजब मागणीने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बीडमधील घटनांवर बोलताना विनायक राऊतांनी बीडला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली. राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही आहेत, ते कोणालाही सोडणार नाही असं सांगतात परंतु गुंडांना पायबंदही घालत नाही. अशात जर बीड वासियांचे जीवन सुरळीत चालवायचं असेल, इथल्या लोकप्रतिनिधींना काम करण्यासाठी चांगले वातावरण करायचे असेल तर बीडमधील संपूर्ण शासन व्यवस्था केंद्रशासित करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय बीड जिल्ह्यात हैवानांचा हैदोस सुरू आहे. पोलीस प्रशासन त्यावर आळा घालण्यास अयशस्वी ठरलं आहे. बीडला थेट केंद्रातून शासन निर्माण करण्याची आवश्यकता आहे तरच बीडला शांतता आणि सुव्यवस्था नांदेल. अन्यथा लोकप्रतिनिधी आणि सरपंचाचे अनेक बळी तिथे जाण्याची शक्यता आहे अशी भीतीही माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सरपंच हत्याकांड प्रकरणी सरकार अजिबात गंभीर नाही. बीड,परभणीमध्ये रोज नवेनवे पैलू दिसून येत असून नवीन माहिती समोर येत आहे तरीही मुख्यमंत्री गंभीर नाहीत. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, मात्र तो ही सरकार घेत नाहीत. त्यामुळे एकंदरीत हे सरकार निगरगठ्ठ झाल्याचं दिसून येते. ज्या क्रूर पद्धतीने देशमुख यांना चार तास मारलं गेलं त्याचा मी निषेध करते. जनावराला अस मारलं तर अंगावर शहारे येतात, हे तर माणसाला मारत आहेत असं सुरेश धस अस म्हणाले होते आणि हे असं बीड जिल्ह्यात पहिल्यांदा झालं नाही, बीड जिल्हा हा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेले मात्र आता त्यांना हे भोगावं लागणार असून त्यांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.

धनंजय मुंडेंनी राजीनामाच द्यावा

संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा आणि दोषींना अटक करावी अशी मागणी करत दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. जवळपास २ तासांनी धनंजय देशमुख खाली उतरले मात्र तोपर्यंत सर्व ग्रामस्थ, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित जमून धनंजय देशमुखांना टाकीवरून खाली उतरण्याची विनवणी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप श्रीरसागर यांनी केली. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणVinayak Rautविनायक राऊत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस