शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही; देशमुख कुटुंबीयांना CM फडणवीसांचा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 22:04 IST

आम्हाला आतापर्यंत झालेल्या तपासाचा चौकशी अहवाल २ दिवसात दिला जाईल असं सांगितले आहे असंही धनंजय देशमुख यांनी माध्यमांना सांगितले आहे. 

मुंबई - बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आज देशमुख कुटुंबीयांनी सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही. देशमुख कुटुंब जे अधिकारी सांगतील त्यांना एसआयटीत घेऊ असा शब्द फडणवीसांनी देशमुख कुटुंबाला दिला आहे. या भेटीवेळी आमदार सुरेश धस हेदेखील उपस्थित होते. 

या भेटीनंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्‍यांनी अधिवेशनात पहिल्या दिवशी जे सांगितले तेच आज आश्वासन दिले. कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. गुन्हेगाराला माफ केले जाणार नाही हे दाखवून दिले जाईल. या प्रकरणावर आम्ही मुख्यमंत्र्‍यांशी चर्चा केली. आमच्याकडे जे काही होते ते दाखवले आहे. आम्हाला न्याय हवा. न्यायाची भूमिका आम्ही मागितली आहे. हा तपास निष्पक्षपातीपणे झाला पाहिजे. या गुन्ह्यात कुणीही मोठा असला तरी त्याला शिक्षा होणार असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही कुणाच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. मुख्यमंत्री फडणवीस हा त्यांचा निर्णय आहे. परंतु आम्हाला न्याय हवा. आम्ही एफआयआरनुसार त्यांच्याशी चर्चा केली. जी घटना घडली त्या काळातील सर्वांचे सीडीआर काढा त्यानुसार तपास करा. गेल्या ४-५ महिन्यातील FIR दिलेत. आम्हाला आतापर्यंत झालेल्या तपासाचा चौकशी अहवाल २ दिवसात दिला जाईल असं सांगितले आहे असंही धनंजय देशमुख यांनी माध्यमांना सांगितले आहे. 

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड, हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावा, या मागणीसह धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. परंतु वकिलाने विश्वासात न घेताच ही याचिका केल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केला. न कळवता वकिलाने स्वतःच याचिका दाखल केली, असा निर्वाळा धनंजय देशमुखांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडे