शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

“बाबांना वाचवू शकलो नाही, पण आता मनोज जरांगेंना काही होऊ देणार नाही”: वैभवी देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:10 IST

Vaibhavi Deshmuke Meet Manoj Jarange Patil: लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की, दादांच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, असे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.

Vaibhavi Deshmuke Meet Manoj Jarange Patil: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली होती. मनोज जरांगे पाटील यांनीही सातत्याने ही मागणी लावून धरली होती. मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकडे वळवला असून, आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात बीडचे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने सहभाग घेत मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी यानंतर प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे यांच्यासोबत अनेकांनी त्यांच्या आमरण उपोषणात सहभाग घेतला आहे. मनोज जरांगे यांच्यासह अनेकांची प्रकृती तिसऱ्या दिवशी खालावली आहे. बीड प्रकरणात सक्रीय असलेल्या मनोज जरांगे यांना साथ देण्यासाठी मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख अंतरवाली सराटी येथे गेले आहेत. यासह संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही आमरण उपोषणस्थळी पोहोचलेले आहेत. मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर वैभवी देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. 

मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेतील. दादा केवळ आमच्या कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कुटुंबाचा भाग आहेत. आम्ही दादांना काही होऊ देणार नाही. माझे वडील तर गेले, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. पण दादांना आम्ही काही होऊ देणार नाही. माझ्या वडिलांना न्याय मिळावा आणि दादांच्या आरक्षणासाठीच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे. दादांची तब्येत खूप खालावली आहे. त्यांना बोलतानाही येत नाही. आमच्या आज्जीने त्यांना आग्रह केल्यानंतर त्यांनी एक घोट पाणी प्यायले. आताही ते सलाइनसाठी नकार देत आहेत, असे वैभवी देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आरक्षण मिळायला हवे. आम्ही दादांना काही होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की, दादांच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या. कारण दादांची तब्येत खूप बिघडत आहे, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील