शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बीड : बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक, घातपाताचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 09:29 IST

दहावी व बारावीच्या परीक्षेतील तब्बल १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बीड : येथील गटसाधन केंद्रात शनिवारी झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेतील तब्बल १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.शनिवारी बारावीचा गणिताचा तर दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल या विषयाचा पेपर झाला. तालुक्यातील ७ परीक्षा केंद्रांवर बारावीची तर ३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली. परीक्षा संपल्यानंतर गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांनी सर्व उत्तरपत्रिका स्वत: तपासून घेत गटसाधन केंद्रात ठेवल्या. साडेपाच वाजेच्या सुमारास ते निघून गेले. त्यानंतर रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गटसाधन केंद्रातून धूर निघत असल्याचे समजले. ही माहिती तात्काळ ढवळे यांना दिली. त्यांनी धाव घेत गटसाधन केंद्र उघडले, तत्पूर्वीच बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. हा सर्व प्रकार मुद्दामहून केल्याचा संशय प्रथमदर्शनी व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याची नोंद झाली नव्हती. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.खिडकीच्या कडेला आढळली सुतळी-ज्या खोलीमध्ये उत्तरपत्रिका होत्या त्याच्या बाजूलाच एक खिडकी आहे, या खिडकीतून सुतळी लोंबकळताना दिसून आली. विशेष म्हणजे या खोलीमध्ये वीज नसल्याने हा सर्व प्रकार घातपातच आहे, असे बोलले जात आहे.या सात केंद्रांतील उत्तरपत्रिका खाक-वसंत महाविद्यालय, केज, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, केज, रामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, केज, पुरुषोत्तमदादा सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय सारणी (आनंदगाव), काळेगाव कनिष्ठ महाविद्यालय काळेगाव घाट, श्याम कनिष्ठ महाविद्यालय दहिफळ (वडमाऊली), युसूफवडगाव कनिष्ठ महाविद्यालय, युसूफवडगाव, जीवन प्रगती कनिष्ठ महाविद्यालय, नांदूरघाट या केंद्रांवर झालेल्या परीक्षेतील उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. दहावीचे केंद्र समजू शकले नाहीत.सुरक्षितता चव्हाट्यावर-जिल्ह्यात दहावीचे १५ परीरक्षक केंद्र आहेत तर बारावीचे १४ एवढे आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य या केंद्रांमध्ये बंद असते. परंतु शिक्षण विभागाकडून या केंद्रांना सुरक्षा नसते. त्यामुळेच अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे. या घटनेच्या निमित्ताने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला-या १० केंद्रांवर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आगीत खाक झाल्या आहेत. आता आपले पुढे काय होणार? बोर्ड काय निर्णय घेणार? याबाबत विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आता बोर्ड या विद्यार्थ्यांची नव्याने परीक्षा घेणार की, यावर वेगळा तोडगा काढणार हे वेळच ठरवेल.

टॅग्स :Studentविद्यार्थीBeedबीडexamपरीक्षा