शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

बीड : बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक, घातपाताचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 09:29 IST

दहावी व बारावीच्या परीक्षेतील तब्बल १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बीड : येथील गटसाधन केंद्रात शनिवारी झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेतील तब्बल १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.शनिवारी बारावीचा गणिताचा तर दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल या विषयाचा पेपर झाला. तालुक्यातील ७ परीक्षा केंद्रांवर बारावीची तर ३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली. परीक्षा संपल्यानंतर गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांनी सर्व उत्तरपत्रिका स्वत: तपासून घेत गटसाधन केंद्रात ठेवल्या. साडेपाच वाजेच्या सुमारास ते निघून गेले. त्यानंतर रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गटसाधन केंद्रातून धूर निघत असल्याचे समजले. ही माहिती तात्काळ ढवळे यांना दिली. त्यांनी धाव घेत गटसाधन केंद्र उघडले, तत्पूर्वीच बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. हा सर्व प्रकार मुद्दामहून केल्याचा संशय प्रथमदर्शनी व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याची नोंद झाली नव्हती. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.खिडकीच्या कडेला आढळली सुतळी-ज्या खोलीमध्ये उत्तरपत्रिका होत्या त्याच्या बाजूलाच एक खिडकी आहे, या खिडकीतून सुतळी लोंबकळताना दिसून आली. विशेष म्हणजे या खोलीमध्ये वीज नसल्याने हा सर्व प्रकार घातपातच आहे, असे बोलले जात आहे.या सात केंद्रांतील उत्तरपत्रिका खाक-वसंत महाविद्यालय, केज, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, केज, रामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, केज, पुरुषोत्तमदादा सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय सारणी (आनंदगाव), काळेगाव कनिष्ठ महाविद्यालय काळेगाव घाट, श्याम कनिष्ठ महाविद्यालय दहिफळ (वडमाऊली), युसूफवडगाव कनिष्ठ महाविद्यालय, युसूफवडगाव, जीवन प्रगती कनिष्ठ महाविद्यालय, नांदूरघाट या केंद्रांवर झालेल्या परीक्षेतील उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. दहावीचे केंद्र समजू शकले नाहीत.सुरक्षितता चव्हाट्यावर-जिल्ह्यात दहावीचे १५ परीरक्षक केंद्र आहेत तर बारावीचे १४ एवढे आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य या केंद्रांमध्ये बंद असते. परंतु शिक्षण विभागाकडून या केंद्रांना सुरक्षा नसते. त्यामुळेच अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे. या घटनेच्या निमित्ताने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला-या १० केंद्रांवर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आगीत खाक झाल्या आहेत. आता आपले पुढे काय होणार? बोर्ड काय निर्णय घेणार? याबाबत विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आता बोर्ड या विद्यार्थ्यांची नव्याने परीक्षा घेणार की, यावर वेगळा तोडगा काढणार हे वेळच ठरवेल.

टॅग्स :Studentविद्यार्थीBeedबीडexamपरीक्षा