शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बीड : बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक, घातपाताचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 09:29 IST

दहावी व बारावीच्या परीक्षेतील तब्बल १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बीड : येथील गटसाधन केंद्रात शनिवारी झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेतील तब्बल १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.शनिवारी बारावीचा गणिताचा तर दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल या विषयाचा पेपर झाला. तालुक्यातील ७ परीक्षा केंद्रांवर बारावीची तर ३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली. परीक्षा संपल्यानंतर गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांनी सर्व उत्तरपत्रिका स्वत: तपासून घेत गटसाधन केंद्रात ठेवल्या. साडेपाच वाजेच्या सुमारास ते निघून गेले. त्यानंतर रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गटसाधन केंद्रातून धूर निघत असल्याचे समजले. ही माहिती तात्काळ ढवळे यांना दिली. त्यांनी धाव घेत गटसाधन केंद्र उघडले, तत्पूर्वीच बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. हा सर्व प्रकार मुद्दामहून केल्याचा संशय प्रथमदर्शनी व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याची नोंद झाली नव्हती. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.खिडकीच्या कडेला आढळली सुतळी-ज्या खोलीमध्ये उत्तरपत्रिका होत्या त्याच्या बाजूलाच एक खिडकी आहे, या खिडकीतून सुतळी लोंबकळताना दिसून आली. विशेष म्हणजे या खोलीमध्ये वीज नसल्याने हा सर्व प्रकार घातपातच आहे, असे बोलले जात आहे.या सात केंद्रांतील उत्तरपत्रिका खाक-वसंत महाविद्यालय, केज, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, केज, रामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, केज, पुरुषोत्तमदादा सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय सारणी (आनंदगाव), काळेगाव कनिष्ठ महाविद्यालय काळेगाव घाट, श्याम कनिष्ठ महाविद्यालय दहिफळ (वडमाऊली), युसूफवडगाव कनिष्ठ महाविद्यालय, युसूफवडगाव, जीवन प्रगती कनिष्ठ महाविद्यालय, नांदूरघाट या केंद्रांवर झालेल्या परीक्षेतील उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. दहावीचे केंद्र समजू शकले नाहीत.सुरक्षितता चव्हाट्यावर-जिल्ह्यात दहावीचे १५ परीरक्षक केंद्र आहेत तर बारावीचे १४ एवढे आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य या केंद्रांमध्ये बंद असते. परंतु शिक्षण विभागाकडून या केंद्रांना सुरक्षा नसते. त्यामुळेच अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे. या घटनेच्या निमित्ताने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला-या १० केंद्रांवर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आगीत खाक झाल्या आहेत. आता आपले पुढे काय होणार? बोर्ड काय निर्णय घेणार? याबाबत विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आता बोर्ड या विद्यार्थ्यांची नव्याने परीक्षा घेणार की, यावर वेगळा तोडगा काढणार हे वेळच ठरवेल.

टॅग्स :Studentविद्यार्थीBeedबीडexamपरीक्षा