शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे निसर्ग विरोधातील...: डॉ. मोहन आगाशे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 17:28 IST

सद्यस्थितीत 'कोरोना' ला कसं हरवायचं नि मनुष्याच्या शरीरातून या विषाणूला कसं नष्ट करायचं यामागे मनुष्यजात लागली आहे..

ठळक मुद्देज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांची कोरोनाविषयीची वैचारिक, चिंतनशील मांडणी..

नम्रता फडणीस-    पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग आपल्याला निरनिराळ्या प्रकारे संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे. भूकंप, त्सुनामी,महापूर येत आहे. पावसाचं चक्र उलटसुलट झालं आहे. पण आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत. अखेर निसर्गाने त्याचा मार्ग शोधला आहे. आपण सतत निसर्गाच्या विरोधात जात आहोत. आपण त्याचाच एक भाग आहोत हे विसरलो आहोत. त्यामुळे ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गविरोधातील आहे, अशा वैचारिक, चिंतनशील मांडणीतून ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी ' मानवाला सूचित केले आहे.     सद्यस्थितीत 'कोरोना' ला कसं हरवायचं नि मनुष्याच्या शरीरातून या विषाणूला कसं नष्ट करायचं यामागे मनुष्यजात लागली आहे.  रात्रंदिवस कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वॉरियर्स जीवाचे रान करीत आहेत. पण ही लढाई आत्ताची नाही असे डॉ. मोहन आगाशे यांनी ' लोकमत' शी बोलताना सांगितले.   ते म्हणाले, वर्तमान जगताना भूत आणि भविष्याचा संदर्भ असावा लागतो. जसं एखाद्या चित्राला पार्श्वभूमी असल्याशिवाय ते उठून दिसत नाही. तशीच माणसाच्या आयुष्याला पार्श्वभूमी लागते. जे काही घडले आणि घडणार आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण आणि निसर्ग वेगळे नाही. आपण एकच आहोत. पण निसर्ग आपल्यापेक्षा मोठा आहे. आपण त्याचाच एक भाग आहोत. आपण जिथे आहोत तिथून जग सुरू होते असा विचार जेव्हा सुरू झाला. तेव्हा खरी पंचाईत झाली. पूर्वी वैद्यकशास्त्रात रुग्ण आला की माणूस बघायचे, आजार बघायचे नाहीत, माणसा प्रमाणे औषध दिले जायचे. पण आज आधी आजार बघून मग मनुष्याला औषध दिले जात आहे.आपला व्यवसाय हा कधी धंदा झाला हे कळले देखील नाही. पण पैशाने मिळणाऱ्या  गोष्टी या निव्वळ भौतिक आहेत. ही सगळी एक निसर्गलॉजी आहे.    निसर्ग म्हणजे एकमेकांशी असलेलं नात आहे. सजीव, निर्जीव ची एक समज उमज असावी लागते. मात्र आज बुद्धीची वाढ संवेदनापेक्षा जलद गतीने झाली आहे. नात टिकविण्यासाठी बुद्धी नि संवेदना दोन्हींची गरज लागते. मग ते नात निसर्गाच का असेना? निसर्गाचा एक घटक हा ' माणूस' आहे. पण माणसाच्या बुद्धीचा वापर वेगळ्याच कारणासाठी होत आहे.  ' प्रगती' या  नावाखाली माणूस म्हणून एक वेगळंच रूप धारण केलं आहे.आपण निसर्गाच्या विरोधात जात आहोत.    आपण आपल्या हाताने निसर्गाचे संतुलन बिघडवलं आहे. त्यामुळे आज मानवजातच त्याला बळी पडते आहे. पण निसर्ग आपल्यालाही आपलंच मानतो. तो फक्त त्याचं बिघडलेलं तंत्र दुरुस्त करतो आहे. तो आपल्याला सांगू बघतो आहे की मायक्रोस्कोपखालीही सहज न दिसू शकणार हा व्हायरस तुला नष्ट करू शकतो. तर  थोडासा नतमस्तक हो. तू माझाच भाग आहेस हे मी विसरलो नाहीये, तू ही विसरू नकोस. याकडे लक्ष वेधण्याचा डॉ आगाशे यांनी प्रयत्न केला आहे..........आपण लोकांचं आयुर्मान वाढवतोय     आपण मेडिकल सायन्स, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्याचा आधारे माणसाचं आयुर्मान वाढवत आहोत. शरीराचे अवयव हे प्रत्यारोपित करत आहोत आणि निसर्गाचे संतुलन बिघडवत आहोत. नैसर्गिकरित्या जन्म- मृत्यू होऊच देत नाहीयोत. जन्म-मृत्यू ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्ग कायम आपलं संतुलन जपण्याच्या प्रयत्नात असतो. एक विषाणू आपण नष्ट केला तर तोच रूप बदलून पुन्हा येतो. आपण सतत निसर्गाच्या विरोधात जात आहोत असे डॉ आगाशे यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे.......

टॅग्स :PuneपुणेMohan Agasheमोहन आगाशेNatureनिसर्गenvironmentपर्यावरणcorona virusकोरोना वायरस बातम्या