शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बारामतीचा जिरायती भाग होरपळणार

By admin | Updated: April 5, 2017 01:16 IST

जसजसा उन्हाळा वाढू लागतो, तशी बारामतीच्या जिरायती भागातील पाणीसमस्या उग्र रूप धारण करू लागते.

जसजसा उन्हाळा वाढू लागतो, तशी बारामतीच्या जिरायती भागातील पाणीसमस्या उग्र रूप धारण करू लागते. मागील पाच वर्षांपासून या भागाला दुष्काळाने ग्रासले आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे. बारामती तालुक्यातील जिरायती भागात वाढत्या उन्हाळ्याबरोबर पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक गावे व वाड्यावस्त्यांमधून टँकरची मागणी पुढे येऊ लागली आहे. विहिरी, कूपनलिका, विंधनविहिरी आदींची पाणीपातळी खोलवर गेली आहे. सध्या घरातील माणसांना पिण्याच्या पाण्याची तजवीज करताना धावपळ करावी लागत असताना दारातील जनावरांना पाणी आणायचे कोठून, असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. तालुक्याच्या मोरगाव ते कऱ्हावागज या २२ गावांपैकी मोरगाव-बारामती रस्त्यालगतच्या मोरगाव, आंबी, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी लोणी, जळगाव क. प. या गावांना नाझरे जलाशयावरील पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळते. परंतु अपुरा व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे याही भागातून स्वतंत्र टँकरची मागणी पुढे येण्याची शक्यता आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या दोन ते तीन टाक्या व सार्वजनिक विहीर नळ योजना आहे. परंतु स्थानिक पाण्याचे स्रोतच आटल्याने एकेका गावात कोट्यवधी रुपये खर्च होऊनही ही गावे तहानलेलीच आहेत. त्यामुळे निदान या सरकारने तरी या भागासाठी कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. बारामती तालुक्यातील जिरायती भागात रब्बी हंगाम वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांपुढे चाराटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. या भागातील पशुधन वाचविण्यासाठी व दुग्ध व्यवसाय टिकविण्यासाठी चारा मिळणे गरजेचे आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार आहे. रब्बी हंगामात या संपूर्ण पट्ट्यात ज्वारीचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. यंदा या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. थोड्याफार ओलीवर पेरणी केलेल्या ज्वारीची यंदा नंतरच्या पावसाअभावी ज्वारी पिकाची वाढच झाली नाही. (वार्ताहर) टँकरसाठी प्रस्ताव दाखल तालुक्यातील जिरायती पट्ट्यात मागील पाच वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. खरीप व रब्बीचे सलग दोन हंगाम वाया गेले आहेत. या वर्षी ज्वारीच्या पेरणीनंतर पाऊसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी ज्वारीचे बाटूकही हाती लागले नाही. काळखेरवाडी, मुर्टी, देऊळगाव रसाळ, सावळ, जैनकवाडी, भोंडवेवाडी, मोराळवाडी, मुढाळे, पारवडी, जळगाव सुपे आदी गावांमधून ११ टँकरसाठी ११ प्रस्ताव पंचायत समितीला आले आहेत. टँकरमंजुरीसाठी हे प्रस्ताव तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जाणार आहेत.