शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

बारामतीचा जिरायती भाग होरपळणार

By admin | Updated: April 5, 2017 01:16 IST

जसजसा उन्हाळा वाढू लागतो, तशी बारामतीच्या जिरायती भागातील पाणीसमस्या उग्र रूप धारण करू लागते.

जसजसा उन्हाळा वाढू लागतो, तशी बारामतीच्या जिरायती भागातील पाणीसमस्या उग्र रूप धारण करू लागते. मागील पाच वर्षांपासून या भागाला दुष्काळाने ग्रासले आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे. बारामती तालुक्यातील जिरायती भागात वाढत्या उन्हाळ्याबरोबर पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक गावे व वाड्यावस्त्यांमधून टँकरची मागणी पुढे येऊ लागली आहे. विहिरी, कूपनलिका, विंधनविहिरी आदींची पाणीपातळी खोलवर गेली आहे. सध्या घरातील माणसांना पिण्याच्या पाण्याची तजवीज करताना धावपळ करावी लागत असताना दारातील जनावरांना पाणी आणायचे कोठून, असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. तालुक्याच्या मोरगाव ते कऱ्हावागज या २२ गावांपैकी मोरगाव-बारामती रस्त्यालगतच्या मोरगाव, आंबी, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी लोणी, जळगाव क. प. या गावांना नाझरे जलाशयावरील पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळते. परंतु अपुरा व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे याही भागातून स्वतंत्र टँकरची मागणी पुढे येण्याची शक्यता आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या दोन ते तीन टाक्या व सार्वजनिक विहीर नळ योजना आहे. परंतु स्थानिक पाण्याचे स्रोतच आटल्याने एकेका गावात कोट्यवधी रुपये खर्च होऊनही ही गावे तहानलेलीच आहेत. त्यामुळे निदान या सरकारने तरी या भागासाठी कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. बारामती तालुक्यातील जिरायती भागात रब्बी हंगाम वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांपुढे चाराटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. या भागातील पशुधन वाचविण्यासाठी व दुग्ध व्यवसाय टिकविण्यासाठी चारा मिळणे गरजेचे आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार आहे. रब्बी हंगामात या संपूर्ण पट्ट्यात ज्वारीचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. यंदा या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. थोड्याफार ओलीवर पेरणी केलेल्या ज्वारीची यंदा नंतरच्या पावसाअभावी ज्वारी पिकाची वाढच झाली नाही. (वार्ताहर) टँकरसाठी प्रस्ताव दाखल तालुक्यातील जिरायती पट्ट्यात मागील पाच वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. खरीप व रब्बीचे सलग दोन हंगाम वाया गेले आहेत. या वर्षी ज्वारीच्या पेरणीनंतर पाऊसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी ज्वारीचे बाटूकही हाती लागले नाही. काळखेरवाडी, मुर्टी, देऊळगाव रसाळ, सावळ, जैनकवाडी, भोंडवेवाडी, मोराळवाडी, मुढाळे, पारवडी, जळगाव सुपे आदी गावांमधून ११ टँकरसाठी ११ प्रस्ताव पंचायत समितीला आले आहेत. टँकरमंजुरीसाठी हे प्रस्ताव तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जाणार आहेत.