शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

बारामतीचा जिरायती भाग होरपळणार

By admin | Updated: April 5, 2017 01:16 IST

जसजसा उन्हाळा वाढू लागतो, तशी बारामतीच्या जिरायती भागातील पाणीसमस्या उग्र रूप धारण करू लागते.

जसजसा उन्हाळा वाढू लागतो, तशी बारामतीच्या जिरायती भागातील पाणीसमस्या उग्र रूप धारण करू लागते. मागील पाच वर्षांपासून या भागाला दुष्काळाने ग्रासले आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे. बारामती तालुक्यातील जिरायती भागात वाढत्या उन्हाळ्याबरोबर पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक गावे व वाड्यावस्त्यांमधून टँकरची मागणी पुढे येऊ लागली आहे. विहिरी, कूपनलिका, विंधनविहिरी आदींची पाणीपातळी खोलवर गेली आहे. सध्या घरातील माणसांना पिण्याच्या पाण्याची तजवीज करताना धावपळ करावी लागत असताना दारातील जनावरांना पाणी आणायचे कोठून, असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. तालुक्याच्या मोरगाव ते कऱ्हावागज या २२ गावांपैकी मोरगाव-बारामती रस्त्यालगतच्या मोरगाव, आंबी, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी लोणी, जळगाव क. प. या गावांना नाझरे जलाशयावरील पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळते. परंतु अपुरा व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे याही भागातून स्वतंत्र टँकरची मागणी पुढे येण्याची शक्यता आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या दोन ते तीन टाक्या व सार्वजनिक विहीर नळ योजना आहे. परंतु स्थानिक पाण्याचे स्रोतच आटल्याने एकेका गावात कोट्यवधी रुपये खर्च होऊनही ही गावे तहानलेलीच आहेत. त्यामुळे निदान या सरकारने तरी या भागासाठी कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. बारामती तालुक्यातील जिरायती भागात रब्बी हंगाम वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांपुढे चाराटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. या भागातील पशुधन वाचविण्यासाठी व दुग्ध व्यवसाय टिकविण्यासाठी चारा मिळणे गरजेचे आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार आहे. रब्बी हंगामात या संपूर्ण पट्ट्यात ज्वारीचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. यंदा या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. थोड्याफार ओलीवर पेरणी केलेल्या ज्वारीची यंदा नंतरच्या पावसाअभावी ज्वारी पिकाची वाढच झाली नाही. (वार्ताहर) टँकरसाठी प्रस्ताव दाखल तालुक्यातील जिरायती पट्ट्यात मागील पाच वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. खरीप व रब्बीचे सलग दोन हंगाम वाया गेले आहेत. या वर्षी ज्वारीच्या पेरणीनंतर पाऊसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी ज्वारीचे बाटूकही हाती लागले नाही. काळखेरवाडी, मुर्टी, देऊळगाव रसाळ, सावळ, जैनकवाडी, भोंडवेवाडी, मोराळवाडी, मुढाळे, पारवडी, जळगाव सुपे आदी गावांमधून ११ टँकरसाठी ११ प्रस्ताव पंचायत समितीला आले आहेत. टँकरमंजुरीसाठी हे प्रस्ताव तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जाणार आहेत.