शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:48 IST

बारामतीमध्ये बोलताना शरद पवार यांनी राज्यातून परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Baramati Assembly constituency : लोकसभेनंतर आता बारातमीच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात ही लढत होणार असल्याने पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा लागली आहे. या लढतीकडे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विशेष लक्ष दिले आहे. बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवारबारामतीमध्ये सभांचा धडाका लावला आहे. सुपा येथे एका सभेत बोलताना शरद पवार यांनी राज्यातून परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका राज्याचं काम करायचं असेल तर पंतप्रधान कशाला होता? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.

बारातमी विधानसभेची निवडणूक शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. गेली ३५ वर्षे बारामतीचे नेतृत्व करणाऱ्या अजित पवार यांच्यासमोर त्यांचे सख्खे पुतणे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यामुळेच शरद पवार यांनीही बारामतीकडे विशेष लक्ष दिले आहे.  सुपा येथे जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. गुजरातचं कल्याण करा. पण महाराष्ट्राचं नुकसान करू नका, असं शरद पवारांनी म्हटलं.

"पंतप्रधानांनी देशाचा आणि मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांच टाटांशी काय बोलणं काय माहीत नाही. काय जादू झाली माहीत नाही. नागपूरमध्ये विमान बनवण्याचा कारखाना होणार होता. तो गुजरातला नेला. इथे हाताला काम नाही. मोबाईलची चीप बनवणारी कंपनी फॉक्सकॉनचा कारखाना महाराष्ट्रात करायचा होता. वेदांतावाल्यांना पंतप्रधान मोदींनी बोलावून घेतलं. काय जादू केली माहीत नाही. तो महाराष्ट्रातील कारखाना गुजरातला नेला. मी गुजरातच्या विरोधात नाही. गुजरातचं कल्याण करा पण महाराष्ट्राचंही कल्याण करा. महाराष्ट्राचं नुकसान करू नका,” असं शरद पवार म्हणाले.

"तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. पण तुम्ही फक्त एका राज्याचं काम करत असाल तर पंतप्रधान कशाला होता? जाऊन तिथे मुख्यमंत्री व्हा. माझी काही तक्रार नाही. पण हे जे काही घडतंय ते राज्याच्या हिताचं नाही. देशाच्या हिताचं नाही. अनेक राज्यात हाताला काम नाही. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची, ती दाखवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आमचं काम दुसरीकडे चाललं आहे. ते थांबवायचं असेल तर इथली सत्ता बदलली पाहिजे. सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाही,” असंही शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024baramati-acबारामतीSharad Pawarशरद पवार