शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बँक, महसूल खात्याच्या अनास्थेचा शेतक-यांना फटका

By admin | Updated: March 30, 2015 02:16 IST

विदर्भात खरीप हंगामात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. मात्र शेतकऱ्यांच्या एनपीए खात्यांचे पुनरुज्जीवन

विदर्भात खरीप हंगामात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. मात्र शेतकऱ्यांच्या एनपीए खात्यांचे पुनरुज्जीवन किंवा नवीन खाते उघडण्यात बँकेची उदासीनता आणि महसूल खात्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदतीसंदर्भात व्यवस्थित माहिती न पोहोचल्याने कोट्यवधींचा निधी शासनाकडे परत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी गोंदियामध्ये शेतकऱ्यांना १०० टक्के मदत वाटप केल्याचा दावा करण्यात आला आहे.नागपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे खाते नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असल्याने आणि ही बँक डबघाईस आल्याने सुरुवातीला ही रक्कम वाटपात अडचणी निर्माण झाल्या़. अनेकांना या बँकेच्या शाखेतून रक्कम मिळण्यासाठी कसरत करावी लागली. प्रशासनाने शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सूचना केली. मात्र मार्च महिना अखेरमुळे राष्ट्रीयीकृत बँकांनी नवीन खाते उघडण्यात रस दाखविला नाही. ज्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते क्रमांक नियोजित वेळेत दिले, त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. परिणामी नागपूरचे १०१.५८ कोटी रुपये शासनाकडे परत पाठविण्यात आले़ शासनाने २२१.२८ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी ११९.७० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. अमरावतीमध्ये २५१ कोटी ६३ लाखांपैकी २२१ कोटी ४८ लाख १६ हजारांचा निधी ३ लाख ७५ हजार १४ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष जमा झाला. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार किमान २५ ते २६ हजार शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे बँक खाते नंबर दिलेले नाहीत व जे दिले ते चुकीचे असल्याने सुमारे १० कोटींचा निधी परत गेला़ चंद्रपूरला १७० कोटी ६ लाख रुपये मिळाले. पैकी १०१ कोटी ७४ लाख ५७ हजार रुपये वितरीत करण्यात आले. कार्यालयीन खर्चापोटी ४ कोटी २७ लाख ५ हजार ७६२ रुपये खर्च करण्यात आले. काही शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक दिला नाही, तर एकच सातबारामध्ये अनेकांची नावे असल्याने त्या शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.यवतमाळ जिल्ह्यात २४५ कोटी ६४ लाख रुपयाची शासकीय मदत मिळाली़ चार लाख ४७ हजार ५६ शेतकरी मदतीला पात्र ठरले. शोधूनही त्यांच्यापैकी ४८ हजार शेतकऱ्यांचे बँक खातेच सापडले नाही. त्यामुळे ३० कोटी रुपये शासन जमा झाले. वर्धा जिल्ह्याला या नैसर्गिक आपत्ती मदतनिधीत १०७ कोटी ५३ लाख रुपये प्राप्त झाले. यापैकी ८७ टक्के निधी खर्च झाला आहे. या अंतर्गत दोन लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. १८ कोटींचा निधी परत गेला आहे.