शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Maharashtra Politics: “ठाकरे गटातील अनेक आमदार आमचे मित्र, काहींशी बोलणी सुरु, लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:04 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरेंना मातोश्री आणि वर्षा सोडवत नव्हते, अशी टीका शंभुराज देसाई यांनी केली आहे.

Maharashtra Politics: शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. तर दुसरीकडे, शिंदे गटाला राज्यभरातून प्रचंड मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. यातच ठाकरे गटातील उरलेले आमदारही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी पुन्हा एकदा असाच दावा केला आहे. ठाकरे गटातील अनेक आमदार आमचे मित्र आहेत. काहींशी बोलणी सुरु आहे. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. 

ठाकरे गटाचे काही आमदार आणि खासदार रात्री अपरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. हे आमदार आणि खासदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. यावर शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, ठाकरे गटातील आमदार आमचे मित्र आहेत. आमची त्यांच्यासोबत बोलणे सुरू आहे. लवकरच काही आमदार शिंदे गटात येतील, असे म्हटले आहे. 

शिल्लक सेनेत कोणी शिल्लक राहील, असे वाटत नाही

आदित्य ठाकरेंनी अडीच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे होते. त्यावेळी त्यांच्या हातात सत्ता होती. उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या शब्दाला किंमत होती. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे होते. तरीही ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही, अशी टीका करत ठाकरे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. शिल्लक सेनेत कोणी शिल्लक राहिले असे वाटत नाही, असा टोलाही शंभुराज देसाई यांनी लगावला. 

दरम्यान, शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. लोकांच्या दारात गेले पाहिजे हे आम्ही त्यांना सांगत होतो. आम्ही तर जातच होतो. पण तुम्हीही जावे, असे आम्ही सांगत होतो. पण त्यांना मातोश्री आणि वर्षा सोडवत नव्हते. आता सत्ता गेल्यावर उसने आवसान आणले जात आहे, अशी घणाघाती टीकाही शंभुराज देसाई यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईUddhav Thackerayउद्धव ठाकरे