शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

Maharashtra Politics: “संजय राऊत दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत”; शिंदे गटातील नेत्याची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:54 IST

Maharashtra News: संजय राऊतांना सरकार पडण्याचे दिवसा स्वप्न पडतात. पण आमचे सरकार पुढील १०-१५ वर्षे कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, कथित भूखंड घोटाळा यांसह अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सीमाप्रश्नाचा मुद्दा लावून धरत, आमच्याकडे अजून खूप बॉम्ब आहेत, वातीही काढलेल्या आहेत. असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊतांनी केलेल्या टीकेला शिंदे गटातील नेत्याने पलटवार करत खोचक टीका केली आहे. 

विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांत फार तथ्य नसल्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मांडली. तसेच विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे बॉम्ब नाहीत तर लवंगी फटाके असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा बॉम्ब नाही तर काय आहे? देवेंद्र फडणवीस यांना या घोटाळा वाटत नाही? हे गंभीर आहे. हे योग्य नाही. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्याकडून आम्हाला या अपेक्षा नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले. यातच शिंदे गटातील नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

संजय राऊत दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत

संजय राऊत हे दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत, ते बॉम्ब काय फोडणार. सरकार पडण्याच्या त्यांच्या घोषणा या केवळ स्वप्नच राहतील. त्यांच्यापेक्षा शंभर पटीने पक्षप्रवेश आमच्याकडे आहे. संजय राऊतांना सरकार पडण्याचे दिवसा स्वप्न पडतात. पण, आमचे सरकार ही टर्म पूर्ण करून पुढेही १०-१५ वर्षे कायम राहील, असा विश्वास संजय गायकवाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

दरम्यान, अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांनी वारकऱ्यांचा वेश धारण करत भजन म्हणत सरकार विरोधात आंदोलन केले. यावर संजय गायकवाड यांनी टीका केली. एकीकडे देवी-देवतांचा अपमान करायचा आणि त्याच आघाडीच्या नेत्यांनी वारकऱ्यांच्या वेशभुषेत इथे यायचे, ही किती विटंबना आहे? महाराष्ट्र वेडा आहे का? अशी विचारणा संजय गायकवाड यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन