शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विनाअनुदानित शाळांना धोरणानुसार अनुदान: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 13:50 IST

आघाडी सरकारच्या काळात विनाअनुदानित शाळांचा कायम शब्द काढण्यात आला होता. तर तेथील शिक्षकांनी वर्षानुवर्षे विनावेतन काम केले आहे.

नागपूर: विधान परिषदेत शनिवारी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा मुद्दा चांगलाच तापला. विनाअनुदानित शाळांना सरसकट २० टक्के अनुदानाचे सूत्र रद्द करुन प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्यासाठी पावले उचलणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी विधान परिषदेत दिली. विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यासंदर्भात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत १०० टक्के अनुदान तातडीने देण्याची मागणी केली.

२०१४ मध्ये सत्तेत येण्याअगोदर अनेक आश्वासने देण्यात आली होती. परंतु सत्तेत आल्यावर तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विनाअनुदानित शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याची भूमिका घेतली. २०१४ पासून १ हजार ६५८ शाळांना हे अनुदान देण्यास सुरुवात केली. परंतु पाच वर्षे उलटून गेल्यावरदेखील या शाळांना १०० टक्के वेतन अनुदान मिळालेले नाही.

त्यामुळे हे त्या शासनाने केलेले महापाप होते, असा आरोप करीत २०-४०-६०-८०-१०० टक्के या प्रचलित धोरणाप्रमाणे अनुदान देणार का, असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला. आघाडी सरकारच्या काळात विनाअनुदानित शाळांचा कायम शब्द काढण्यात आला होता. तर तेथील शिक्षकांनी वर्षानुवर्षे विनावेतन काम केले आहे.

१०० टक्के अनुदान तातडीने देणार का?

यासंदर्भात बोलताना नागो गाणार यांनी शासनाचा निषेध करण्याची भूमिका घेतली. ४० टक्क्यांचे अनुदान अजून का मिळाले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर रणजित पाटील व अनिल सोले यांनी आक्रमक पवित्रा घेत १०० टक्के अनुदान तातडीने देणार का? असा सवाल मांडला. शासन सकारात्मक आहे असे थोरात सांगत असताना ठोस उत्तराच आग्रह विरोधकांनी धरला. विरोधी सभात्याग करण्याच्या पवित्र्यात असतानाच सभागृहाची बैठक काही मिनिटांसाठी स्थगित करण्यात आली.