शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

नरेंद्र मोदींसाठी बुरे दिन? घटमांडणीच्या भाकितात अतिवृष्टी व भुकंपाचे संकेत

By admin | Updated: April 29, 2017 17:48 IST

सुप्रसिध्द असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील भेंडवड येथील घटमांडणी आणि त्याचे भाकीत २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी जाहीर केले

जयदेव वानखडे, ऑनलाइन लोकमत
जळगाव जामोद
सर्व शेतकरी बांधवांच्या आशेची उत्सुकता वाढविणारी संपूर्ण विदर्भात सुप्रसिध्द असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील भेंडवड येथील घटमांडणी आणि त्याचे भाकीत २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. त्यानुसार २०१७-१८ च्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील. परंतु अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने काही भागामध्ये पिकांची नासाडी होईल. पावसाळा देखील चांगला होईल त्यामध्ये जुन महिन्यात कमी, जुलैमध्ये जास्त, ऑगस्टमध्ये सर्वाधिक तर सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस येईल. जुन महिन्यातील कमी पावसामुळे पेरणीही मागे पुढे होईल. राजकारणाबाबत राजाची गादी ही कायम आहे राजा ही कायम आहे. परंतु गादीवरील मातीमुळे राजाचा ताण वाढेल असे सांगण्यात आले. त्यामुळे राजा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी बुरे दिनची चाहूल असेल असे मानण्यात येत आहे. परकीय राष्ट्रांच्या देशविरोधी कारवाया सुरूच राहतील. परंतु देशाची संरक्षण व्यवस्था त्यांना समर्थपणे तोंड देईल. पाऊस चांगला असल्याने जलाशय भरलेली राहतील. पृथ्वीला मात्र मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागेल. त्यामध्ये अतिवृष्टी, महापूर, भुकंप, त्सुनामी सारखी संकटे उद्भवतील. गुराढोरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवेल. तर अशा येणाºया अनेक संकटांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस येईल. तिजोरीवर प्रचंड ताण येवून देशात चलन तुटवडा भासेल, असे भाकीत वर्तविण्यात आले. त्यामुळे पिक-पाणी साधारण असल्याने शेतकºयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
 
 
पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवड या गावी ३५० पेक्षाही जास्त वर्षापुर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी घटमांडणीची परंपरा सुरू केली. अतिशय जुना काळ आणि सर्व परिसर शेतीवर अवलंबुन असलेला अशावेळी कुठलेही दळणवळणाचे साधने नव्हती तर यंत्रणाचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे हवामान खाते म्हणजे काय आणि त्यांचे अंदाज कसे याबाबत शेतकरी अनभिज्ञ होता. अशा परिस्थितीत चंद्रभान महाराजांच्या घटमांडणीच्या भाकीताचाच आधार शेतकरी घ्यायचे तेव्हापासून ही घटमांडणी आजतागायत त्याच दृढविश्वासाने शेतकºयांसमोर मांडली जाते आणि शेतकरीही मोठ्या आशेने या मांडणीच्या आधारावर पेरणीची दिशा ठरवतो. आणि यातील बहूतांश अंदाज खरे ठरतात. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या विश्वासाला ही मांडणी पात्र राहली आहे.