शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

नरेंद्र मोदींसाठी बुरे दिन? घटमांडणीच्या भाकितात अतिवृष्टी व भुकंपाचे संकेत

By admin | Updated: April 29, 2017 17:48 IST

सुप्रसिध्द असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील भेंडवड येथील घटमांडणी आणि त्याचे भाकीत २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी जाहीर केले

जयदेव वानखडे, ऑनलाइन लोकमत
जळगाव जामोद
सर्व शेतकरी बांधवांच्या आशेची उत्सुकता वाढविणारी संपूर्ण विदर्भात सुप्रसिध्द असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील भेंडवड येथील घटमांडणी आणि त्याचे भाकीत २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. त्यानुसार २०१७-१८ च्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील. परंतु अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने काही भागामध्ये पिकांची नासाडी होईल. पावसाळा देखील चांगला होईल त्यामध्ये जुन महिन्यात कमी, जुलैमध्ये जास्त, ऑगस्टमध्ये सर्वाधिक तर सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस येईल. जुन महिन्यातील कमी पावसामुळे पेरणीही मागे पुढे होईल. राजकारणाबाबत राजाची गादी ही कायम आहे राजा ही कायम आहे. परंतु गादीवरील मातीमुळे राजाचा ताण वाढेल असे सांगण्यात आले. त्यामुळे राजा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी बुरे दिनची चाहूल असेल असे मानण्यात येत आहे. परकीय राष्ट्रांच्या देशविरोधी कारवाया सुरूच राहतील. परंतु देशाची संरक्षण व्यवस्था त्यांना समर्थपणे तोंड देईल. पाऊस चांगला असल्याने जलाशय भरलेली राहतील. पृथ्वीला मात्र मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागेल. त्यामध्ये अतिवृष्टी, महापूर, भुकंप, त्सुनामी सारखी संकटे उद्भवतील. गुराढोरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवेल. तर अशा येणाºया अनेक संकटांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस येईल. तिजोरीवर प्रचंड ताण येवून देशात चलन तुटवडा भासेल, असे भाकीत वर्तविण्यात आले. त्यामुळे पिक-पाणी साधारण असल्याने शेतकºयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
 
 
पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवड या गावी ३५० पेक्षाही जास्त वर्षापुर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी घटमांडणीची परंपरा सुरू केली. अतिशय जुना काळ आणि सर्व परिसर शेतीवर अवलंबुन असलेला अशावेळी कुठलेही दळणवळणाचे साधने नव्हती तर यंत्रणाचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे हवामान खाते म्हणजे काय आणि त्यांचे अंदाज कसे याबाबत शेतकरी अनभिज्ञ होता. अशा परिस्थितीत चंद्रभान महाराजांच्या घटमांडणीच्या भाकीताचाच आधार शेतकरी घ्यायचे तेव्हापासून ही घटमांडणी आजतागायत त्याच दृढविश्वासाने शेतकºयांसमोर मांडली जाते आणि शेतकरीही मोठ्या आशेने या मांडणीच्या आधारावर पेरणीची दिशा ठरवतो. आणि यातील बहूतांश अंदाज खरे ठरतात. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या विश्वासाला ही मांडणी पात्र राहली आहे.