शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

बॅकलॉग भरला !

By admin | Updated: July 16, 2014 01:23 IST

विदर्भाच्या विकासाचा ‘बॅकलॉग’(अनुशेष) वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही भरून निघाला नाही. मात्र मंगळवारी झालेल्या संततधार आणि तितक्याच दमदार पावसाने जून महिन्यातील पावसाचा

उपराजधानी चिंब : जनजीवन विस्कळीतनागपूर: विदर्भाच्या विकासाचा ‘बॅकलॉग’(अनुशेष) वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही भरून निघाला नाही. मात्र मंगळवारी झालेल्या संततधार आणि तितक्याच दमदार पावसाने जून महिन्यातील पावसाचा अनुशेष काहीअंशी तरी भरून काढला. सकाळी ८.३० ते सायं.५.३० दरम्यान १०६ मि.मी.पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसात एकूण ११६ मिमी. पाऊस झाला असून तो जुलै महिन्याच्या एकूण सरासरीच्या ३७ टक्के आहे. दरम्यान पुढच्या २४ तासात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.७ जूनला मान्सूनचे आगमन होते. यंदा विदर्भात तो १९ जूनपासून सक्रिय झाला. मात्र विविध शास्त्रीय कारणांमुळे तो बरसतच नव्हता. अखेर त्याने हजेरी लावली. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभर बरसतच होता. कधी रिमझिम तर कधी जोरदार बरसणाऱ्या सरीमुळे नागपूरकर चिंब झाले. मुरवता पाऊस असल्याने शेतकरीही सुखावला. महिन्याभरापासून थांबलेल्या पेरण्यांना यामुळे गती येण्याची शक्यता कृषी खात्याने वर्तविली आहे. दुष्काळाचे संकट तात्पुरते टळल्याने जिल्हा प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.सोमवारची सकाळच रिमझिम पावसाने झाली. मुले शाळेत जातांना भिजली व परत येतानाही त्यांनी पावसाचा आनंद घेतला. चाकरमान्यांची अवस्थाही अशीच होती. रेनकोट घालून बाहेर पडूनही कार्यालयात ओले होतच त्यांना जावे लागले. कार्यालय संपल्यावर घरी परत येताना त्यांना चौकाचौकात साचलेल्या पाण्याचा फटका बसला. अनेकांच्या दुचाकी बंद पडल्या. मोठ्या इमारतींच्या तळघरात पाणी शिरले. सखल भागातील वस्त्यांनाही फटका बसला. जागोजागी ‘जाम’शासकीय कार्यालये सुटण्याच्या वेळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. रस्त्यांवरचे पाणी मात्र तुंबलेलेच होते. आपापल्या वाहनांनी कार्यालयांमधून बाहेर पडणाऱ्यांची गर्दी पाहण्यासारखी होती. मोटारगाड्या आणि दुचाकी वाहने एकाच वेळी रस्त्यांवर आल्याने आकाशवाणी चौकातील वाहतुकीला अचानक ब्रेक लागला होता. लगबगीने घरी जाण्याची घाई असूनही चौकात ‘जाम’ झाल्याने वाहनांना पुढे सरकण्यास किमान अर्धा तास लागत होता. हा जाम पाहू जाता पोलीस नियंत्रण कक्ष आणि वाहतूक नियंत्रण शाखेला सूचना देण्यात आली. सरकारी कार्यालयात गळतीविभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, रविभवन या सरकारी इमारतींच्या काही भागाला पावसाचा फटका बसला. काही भागात पाणी साचले तर काही भागाला गळतीमुळे ओल आली होती. भर पावसातही सेतू केंद्रात मात्र गर्दी होती. तहसील कार्यालयाच्या परिसरातील गर्दीवरही पावसाचा परिणाम झालेला दिसला नाही (प्रतिनिधी)