शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

“मनोज जरांगे पाटील मुदत वाढवून देऊ शकतील, पण, सरकारने...”; बच्चू कडू यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 12:14 IST

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या मुदतीच्या तारखेवरून घोळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maratha Reservation:मराठा आरक्षणासाठीचा लढा गेल्या काही महिन्यांपासून अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. या मुद्द्यावरून अद्यापही दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले असले तरी सरकार मात्र २ जानेवारीपर्यंत मुदत दिल्याचे सांगत आहे. या तारखांवरून काहीशी संभ्रमावस्था असल्याचे पाहायला मिळत असून, यावरून आता वाद निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. 

यातच बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना, मनोज जरांगे पाटील सरकारला मुदत वाढवून देऊ शकतात, असे म्हटले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने १५ दिवसांचा प्रगती अहवाल दाखवावा. मग मनोज जरांगे यांच्यासोबत बैठक घ्यावी. काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असं मनोज जरांगे यांना वाटले, तरच ते वेळ वाढवून देतील, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी आईची इच्छा आहे. तर...

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा मातोश्रींनी बोलून दाखवली. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यासंदर्भात बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी आईची इच्छा आहे. तर नक्की होतील, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तारखेच्या घोळ दूर करण्यासाठी शनिवारी शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची रूग्णालयात भेट घेतली. तारखेच्या विषयात २४ डिसेंबर आणि २ जानेवारी यात फरक नाही. पाच-सहा दिवसांचा फरक आहे. त्याने काही फरक पडणार नाही. त्याच्या आतही सरकारचे काम होऊ शकते, असे संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBacchu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील