शहरं
Join us  
Trending Stories
1
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
2
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
3
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
4
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
5
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
6
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
7
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
8
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
9
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
10
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
11
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
12
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
13
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
14
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
15
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
16
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
17
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
18
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
19
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
20
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या

Bacchu Kadu : "मी फक्त नावापुरता अध्यक्ष, निवडणुकीत दखल घ्यावी लागेल", बच्चू कडूंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 16:18 IST

Bacchu Kadu : मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे. जर सरकार आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा बच्चू कडू दिला आहे.  

Bacchu Kadu : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठका सुरु आहेत. तसंच, प्रत्येक पक्षाकडून दावे-प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. दरम्यान, महायुतीत सामील असलेल्या प्रहार जनशक्तीचे प्रमुख  बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे. मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे. जर सरकार आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा बच्चू कडू दिला आहे.  

याचबरोबर, दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष, दिव्यांगांसदर्भातले निर्णयही कळवले जात नाहीत अशी खंत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. बच्चू कडू म्हणाले, "आम्हाला नावापुरता दिव्यांग कल्याण अभियानाचा अध्यक्ष केला आहे. जिल्ह्यात जा आणि तक्रारी घ्या एवढंच आमचं काम आहे. दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात, हे आम्हाला कळवलं सुद्धा जात नाही. अनेक गोष्टींसाठी आम्हाला भांडावं लागतं आणि भांडून आम्ही ते करून घेतो. सरकारनं जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर निवडणुकीतून आम्ही दखल दाखवून देऊ. मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे." लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा जनतेचा आहे. पण लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा काहींना बाप-दादांच्या कमाईचा पैसा वाटतो, अशी टीका बच्चू कडू यांनी रवी राणांवर केला आहे. बच्चू कडू म्हणाले, "काही आमदारांना असं वाटतंय की आपण खूप मेहनत केली, घरदार विकून जो पैसा मिळाला तो आपण या लाडक्या बहिणीसाठी लावला. जनतेचा पैसा आहे, सरकारी पैसा हा सगळा आहे. लोकं कर भरतात, याचा विसर या लोकांना पडला आहे. यांना वाटतं आपल्या बाप दादांच्या कमाईतून ही योजना चालू आहे, हे चुकीचा आहे. सरकार हे लोकांसाठी असतं आणि जर लोकांसाठी सरकार नसेल तर आमचा रक्तातील दोष म्हणा किंवा चांगुलपणा म्हणा, तो राहणारच आहे." 

दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरूनही बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू म्हणाले, "तुम्ही लाडकी बहीण आणली १५०० रुपये देत आहे. दिव्यांगांचा महिना दीड हजार केला का? अडचणीत असणाऱ्यांसाठी तुमचे हात समोर येत नाहीत. लाडकी बहीण योजना चांगली आहे. पण तुम्ही दिव्यांगांना का बाजूला ठेवता ? अनाथांना, विधवा महिलांना का बाजूला ठेवता? त्यांना तुम्ही लाडकी बहीण म्हणत नाही? विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा पगार मिळेल, तेवढेच मिळणार, लाडकी बहिणीचा त्यांना फायदा होणार नाही."

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदे