शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

“हे सर्व थांबवायचे असेल तर प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे”: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 19:59 IST

Winter Session Maharashtra 2023: मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते. त्यामुळे पुरावे शोधल गेले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Winter Session Maharashtra 2023: माझ्यावर टीका केली तर ठीक आहे. पण ज्या दिवशी तुम्ही जातीवर बोलायला लागाल. मराठ्यांनी असे केले, मराठ्यांनी तसे केले, मराठा समाज जणू अन्याय करणारी जमात झाली असल्याचे चित्र उभे करण्यात येत आहे. राजकारण होत राहील. तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मात्र विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका. अमृत पाजून मुख्यमंत्री व्हा, आणि असे होता येते. घरे जाळण्यात आली याचा निषेध केलाच पाहिजे. घर जाळण्यापर्यंत हात जात असतील तर त्यांची हात पाय तोडून टाका, या शब्दांत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला. 

ज्याचे आमदार जास्त त्यांना कमी आरक्षण द्याल असे म्हणत असाल तर २०० आमदार असलेल्यांना आरक्षण द्यायच नाही का?, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते. त्यामुळे पुरावे शोधले गेले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले. हेदेखील यांना मान्य नाही. मराठा समाजात किती आमदार आणि खासदार आहेत यावरून ते मागास नाही असे कसे म्हणता येईल? अशी विचारणाही बच्चू कडू यांनी केली. 

हे सर्व थांबवायचे असेल तर प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे

जातीपाती मी मानत नाही, जात लागली की मरेपर्यंत जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी शरीरात जात घुसू दिली नाही. पण आपण पुतळ्याला जात लावतो. हिंदू खतरे में है म्हणतात, पण कोणीच खतरे में नहीं है. नेता खतरे में है. त्यामुळे, हे सर्व थांबवायचं असल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे. दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, काही सभा बघितल्या, त्यात १६० आमदार पाडू असे म्हणाले. काय भाषा आहे. विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका. मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या किती वाईट आहे. ५० आत्महत्या झाल्या, यावर कोणी बोलत नाही. एवढे आपण जातीवादी झालो. एखाद्या आंदोलनात लाठीचार्ज करता, त्याची चौकशी झाली पाहिजे. तुमच्या बाजूला गृहमंत्री बसतात आणि आग कशी लावली म्हणता. बाजूला अर्थमंत्री बसतात आणि म्हणता ओबीसीला काही दिले नाही. ही भाषा मंत्रिमंडळ बैठकीत केली पाहिजे. अशी भाषा जनमानसातील नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBacchu Kaduबच्चू कडूPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर