शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

“हे सर्व थांबवायचे असेल तर प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे”: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 19:59 IST

Winter Session Maharashtra 2023: मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते. त्यामुळे पुरावे शोधल गेले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Winter Session Maharashtra 2023: माझ्यावर टीका केली तर ठीक आहे. पण ज्या दिवशी तुम्ही जातीवर बोलायला लागाल. मराठ्यांनी असे केले, मराठ्यांनी तसे केले, मराठा समाज जणू अन्याय करणारी जमात झाली असल्याचे चित्र उभे करण्यात येत आहे. राजकारण होत राहील. तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मात्र विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका. अमृत पाजून मुख्यमंत्री व्हा, आणि असे होता येते. घरे जाळण्यात आली याचा निषेध केलाच पाहिजे. घर जाळण्यापर्यंत हात जात असतील तर त्यांची हात पाय तोडून टाका, या शब्दांत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला. 

ज्याचे आमदार जास्त त्यांना कमी आरक्षण द्याल असे म्हणत असाल तर २०० आमदार असलेल्यांना आरक्षण द्यायच नाही का?, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते. त्यामुळे पुरावे शोधले गेले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले. हेदेखील यांना मान्य नाही. मराठा समाजात किती आमदार आणि खासदार आहेत यावरून ते मागास नाही असे कसे म्हणता येईल? अशी विचारणाही बच्चू कडू यांनी केली. 

हे सर्व थांबवायचे असेल तर प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे

जातीपाती मी मानत नाही, जात लागली की मरेपर्यंत जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी शरीरात जात घुसू दिली नाही. पण आपण पुतळ्याला जात लावतो. हिंदू खतरे में है म्हणतात, पण कोणीच खतरे में नहीं है. नेता खतरे में है. त्यामुळे, हे सर्व थांबवायचं असल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे. दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, काही सभा बघितल्या, त्यात १६० आमदार पाडू असे म्हणाले. काय भाषा आहे. विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका. मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या किती वाईट आहे. ५० आत्महत्या झाल्या, यावर कोणी बोलत नाही. एवढे आपण जातीवादी झालो. एखाद्या आंदोलनात लाठीचार्ज करता, त्याची चौकशी झाली पाहिजे. तुमच्या बाजूला गृहमंत्री बसतात आणि आग कशी लावली म्हणता. बाजूला अर्थमंत्री बसतात आणि म्हणता ओबीसीला काही दिले नाही. ही भाषा मंत्रिमंडळ बैठकीत केली पाहिजे. अशी भाषा जनमानसातील नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBacchu Kaduबच्चू कडूPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर