शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राहुल जगतापांसमोर पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 14:31 IST

जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपरिषदेची निवडणुक बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच २०१४ मध्ये सर्वात तरुण आमदार ठरलेले श्रीगोंदायाचे  राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्यापुढे पुन्हा भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आवाहन असणार आहे. मागच्यावेळी तब्बल १३ हजार मतांनी नवख्या जगताप यांनी पाचपुतेंना पराभूत केले होते. त्यामुळे हा विजय २०१९ मध्ये जगताप कायम ठेवणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.

२०१४ मध्ये अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेले राहुल जगताप यांना श्रीगोंदा मतदारसंघातून पुन्हा बबनराव पाचपुतेंचा सामना करावा लागणार आहे. मोदी लाटेत सुद्धा जगताप यांनी ९९ हजार २८१ मतं मिळवत १३ हजार मतांनी पाचपुतेंना पराभूत केले होते. मात्र या पाच वर्षात पाचपुतेनी मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली आहे. त्यामुळे जगताप यांना यावेळी पाचपुतेंच मोठे आव्हान असणार आहे.

जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपरिषदेची निवडणुक बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत जरी नगराध्यक्षपदी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या शुभांगी पोते विजयी झाल्या असल्या तरीही, १८ पैकी ११ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. त्यातच गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून कमळ हातात घेतल्याने त्याचा फायदा सुद्धा पाचपुते यांना होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यावेळी जगताप आणि पाचपुते यांच्यात अटीतटीचा सामना होणार असल्यची चर्चा आहे.