शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बा देवा महाराजा, सालाबादप्रमाण यंदाय टोलमाफी करतय...; मुख्यमंत्र्यांची गणेशभक्तांसाठी मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 20:20 IST

Ganeshotsav Toll Free Pass: गणेशोत्सवानिमित्त कोकणात लाखो वाहने जात असतात. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपुरे आहे.

गणेशोत्सवासाठी सालाबादप्रमाणे यंदाही टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीसाठी टोल माफ केला जाणार आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

गणेशोत्सवानिमित्त कोकणात लाखो वाहने जात असतात. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपुरे आहे. गेल्यावर्षी सरकारने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांपूर्वीच शिंदेंनी या महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी केली होती. एकंदरीतच हा महामार्ग आणखी काही वर्षे तरी चांगल्या प्रकारे सुरु होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे वाहन चालकांना एक्स्प्रेस वे व्हाया पुणे कोल्हापूर महामार्गाचा कोकणात जाण्यासाठी वापर करावा लागत आहे. 

एक्स्प्रेस वेचा आणि पुणे-कोल्हापूर मार्गाचा टोल पाहता नाहकचा भुर्दंड वाहन चालकांना पडत आहे. गणेशभक्तांना हा भुर्दंड पडू नये म्हणून गेल्या काही वर्षांपासून टोलमाफी केली जाते. मुंबई, पुण्यातील पोलीस, आरटीओ ऑफिसमध्ये यासाठी पास दिले जातात. यानुसार पास धारक टोल न देता प्रवास करू शकतात. येत्या ७ सप्टेंबरला गणपती बसणार आहेत. यामुळे कोकणात जाण्याऱ्या लोकांचा प्रवास सुरु झाला आहे. 

या लोकांना उद्यापासून पास मिळणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सूट दिली जाणार आहे. ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ असे स्टीकर्स आणि पास उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलीस स्टेशन आणि आरटीओंना देण्यात आले आहेत. यावर वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव आदी मजकूर असणार आहे.  

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवEknath Shindeएकनाथ शिंदेtollplazaटोलनाका