शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बा देवा महाराजा, सालाबादप्रमाण यंदाय टोलमाफी करतय...; मुख्यमंत्र्यांची गणेशभक्तांसाठी मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 20:20 IST

Ganeshotsav Toll Free Pass: गणेशोत्सवानिमित्त कोकणात लाखो वाहने जात असतात. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपुरे आहे.

गणेशोत्सवासाठी सालाबादप्रमाणे यंदाही टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीसाठी टोल माफ केला जाणार आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

गणेशोत्सवानिमित्त कोकणात लाखो वाहने जात असतात. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपुरे आहे. गेल्यावर्षी सरकारने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांपूर्वीच शिंदेंनी या महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी केली होती. एकंदरीतच हा महामार्ग आणखी काही वर्षे तरी चांगल्या प्रकारे सुरु होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे वाहन चालकांना एक्स्प्रेस वे व्हाया पुणे कोल्हापूर महामार्गाचा कोकणात जाण्यासाठी वापर करावा लागत आहे. 

एक्स्प्रेस वेचा आणि पुणे-कोल्हापूर मार्गाचा टोल पाहता नाहकचा भुर्दंड वाहन चालकांना पडत आहे. गणेशभक्तांना हा भुर्दंड पडू नये म्हणून गेल्या काही वर्षांपासून टोलमाफी केली जाते. मुंबई, पुण्यातील पोलीस, आरटीओ ऑफिसमध्ये यासाठी पास दिले जातात. यानुसार पास धारक टोल न देता प्रवास करू शकतात. येत्या ७ सप्टेंबरला गणपती बसणार आहेत. यामुळे कोकणात जाण्याऱ्या लोकांचा प्रवास सुरु झाला आहे. 

या लोकांना उद्यापासून पास मिळणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सूट दिली जाणार आहे. ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ असे स्टीकर्स आणि पास उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलीस स्टेशन आणि आरटीओंना देण्यात आले आहेत. यावर वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव आदी मजकूर असणार आहे.  

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवEknath Shindeएकनाथ शिंदेtollplazaटोलनाका