शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 06:54 IST

सर्वोच्च न्यायालयाने फार्मसी महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया यंदा ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्याचे निर्देश फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय)ला दिले होते.

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणारी बी. फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहे. महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची वेळ सीईटी सेलवर आली आहे. त्यामुळे फार्मसीची प्रवेश प्रक्रिया कधी पूर्ण होणार हा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने फार्मसी महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया यंदा ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्याचे निर्देश फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय)ला दिले होते. तसेच या महाविद्यालयांना मान्यता प्रक्रियेवर हरकती अथवा सूचना देण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत दिली होती. त्यानुसार यंदा ‘पीसीआय’ने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश विविध राज्य सरकारांच्या प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या प्राधिकरणांना दिले आहेत. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

परिणामी, ‘पीसीआय’ने मान्यता देऊनही आचारसंहितेमुळे राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली नाही. त्यामुळे या महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होऊ शकत आहे.  ‘पीसीआय’ने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांचा समावेश प्रवेश प्रक्रियेत करावा लागणार असल्याने राज्य सरकारची अडचण झाली आहे. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रियेलाच स्थगिती देण्याची वेळ सीईटी सेलवर आली आहे. 

सध्या दोन फेऱ्यांत २१ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश सद्य:स्थितीत बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दोन फेऱ्यांमध्ये २१ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ४९७ महाविद्यालये सहभागी झाले असून, त्यांच्याकडे ४२ हजार २३३ जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी ५० हजार ११७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे अद्यापही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने या प्रवेशांना विलंब होणार आहे. 

टॅग्स :Educationशिक्षण